• Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

◖२६ जानेवारी◗ प्रजासत्ताक दिन निबंध मराठी | Republic Day Essay in Marathi

प्रजासत्ताक दिन निबंध : २०२२ हे वर्ष भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाईल. भारत दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि लोकशाहीचा स्वीकार केला तो दिवस म्हणजे २६ जानेवारी. दुसर्‍या शब्दांत, २६ जानेवारी हा दिवस साजरा करतो ज्या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली.

२६ जानेवारी १९५० रोजी स्वातंत्र्यानंतरच्या जवळपास ३ वर्षांनी आपण एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक बनलो. आज आपण लहान-मोठे प्रजासत्ताक दिन निबंध मराठी खाली दिले आहेत, ते तुम्ही वाचू शकता आणि आपल्या शाळा -कॉलेज मध्ये Republic Day Essay in Marathi लेखन करू शकता. किंवा त्याचा वापर प्रजासत्ताक दिन भाषण म्हणून पण करू शकता.

प्रजासत्ताक दिन निबंध

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध मराठी – Republic Day Essay in Marathi

Table of Contents

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 130 शब्द – Republic Day Essay in Marathi 130 Words

आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. त्यांच्या अत्याचाराला कंटाळून भारतीय नेत्यांनी, क्रांतीवीरांनी अनेक लढे देऊन आपल्या प्राणांची बाजी लावून भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र केले. तरीही २६ जानेवारी १९५० रोजी आपण सार्वभौम झालो. म्हणून प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतभर थाटाने साजरा केला जातो.

२६ जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. सैनिकांचे संचलन, कवायती आणि संपूर्ण भारताचे दर्शन देणारे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. त्या दिवशी एकमेकांना शुभेच्छाही देतात.

शहरातील सर्व कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथेही ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतात. नेत्यांची भाषणे होतात. वंदेमातरम, राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतेही गाईली जातात. लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीटे देतात. त्या दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात.

सगळीकडे रोषणाई, सजावट, रांगोळी काढून परिसर झगमगू लागतो.

भारतात सगळीकडे हा राष्ट्रीय सण साजरा केला जातो.

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 150 शब्द – Republic Day Essay in Marathi 150 Words

१५ ऑगस्ट, १९४७ ह्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि इंग्रज लोकांची आपल्या देशावरील सत्ता संपली. त्यानंतर आपल्या देशात लोकशाही असावी असे ठरले. त्या लोकशाहीचे सर्व नियम ज्यात लिहिले आहेत अशी एक राज्यघटना तयार करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद इत्यादी लोकांनी खूप कष्ट घेऊन केले. अशा रीतीने २६ जानेवारी, १९५० ह्या दिवशी भारत हा देश एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला.

लोकशाही ह्याचा अर्थ लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले सरकार. लोकशाहीत सर्व नागरिक समान असतात, प्रत्येकाला आपला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य असते. दर पाच वर्षांनी निवडणुका होतात आणि ज्या पक्षाला सर्वाधिक मते मिळतात त्या पक्षाचा प्रमुख देशाचा पंतप्रधान बनतो.

दर वर्षी २६ जानेवारी हा दिवस आपण भारतीय नागरिक प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. ह्या दिवशी आम्ही मुले शाळेत जातो आणि ध्वजवंदन करतो. आमचा देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

आम्ही मुले एका स्वतंत्र, लोकशाही देशाचे भावी नागरिक आहोत आणि आमच्या देशाच्या प्रगतीतील वाटा आम्ही उचलू.

Republic Day Essay in Marathi

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 200 शब्द – Republic Day Essay in Marathi 200 Words

प्रजासत्ताक दिन एक महान राष्ट्रीय सण आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांची गुलामी आणि अत्याचारापासून मुक्तता मिळाली. २६ जानेवारी १९५० ला देशात संविधानाची अमलबजावणी सुरू झाली. भारत एक प्रजासत्ताक देश बनला. याच दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसादने आपल्या पदाची शपथ घेतली. म्हणून या दिवशी देशात सणासारखे वातावरण असते. राज्याच्या सर्व राजधान्याच्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. परंतु मुख्य कार्यक्रम देशाची राजधानी दिल्लीत होतो.

२६ जानेवारीला विजय चौकाजवळ इंडिया गेटच्या अलिकडे एका भव्य परेडचे आयोजन केल्या जाते. लाखो नागरीक हे पहायला जमा होतात. लाखो नागरीक हाच कार्यक्रम दूरदर्शनवरून पहातात किंवा रेडिओवरून रनिंग कॉमेंट्री ऐकतात. राष्ट्रपती या ठिकाणी राजेशाही थाटात दाखल होतात. त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाते.

त्यानंतर तिन्ही सेनेचे जवान, बँड, एन.सी.सी.कॅडेट, पोलिस, शाळेतील मूलं आदींची भव्य मिरवणूक निघते. ती मिरवणूक पहाण्यासाठी असते. रंगीत तालीम, लोकनृत्य आणि इतर सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात वेळ जातो. देशाच्या संरक्षणासाठीचे हत्यारे जसे की रडार, तोफा, मिसाइले, लढावू विमान, टँक आदीचे प्रभावी प्रदर्शन यावेळी केले जाते. यामुळे देशाची प्रगती, अखंडता, एकता, शक्ती आणि प्रभाव जगासमोर येतो. यामुळे देशबांधवाना जी प्रेरणा, उत्साह आणि गौरवभावना मिळते ती अद्वितीय असते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती देशाला संबोधीत करतात. संदेश देतात, हे एक अंत्यत महत्त्वाचे प्रसारण असते.

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 250 शब्द – Republic Day Essay in Marathi 250 Words

आपला भारत १५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र झालेला असला तरी २६ जानेवारी, १९५० ह्या दिवशी तो लोकशाही राष्ट्र म्हणून ह्या जगात उदयास आला. भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम थोर विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी केले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात.

ह्या दिवशी सकाळी पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहातात. त्यानंतर सकाळी सात वाजता राष्ट्रपती विजयचौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि तिन्ही भारतीय सैन्यदलांचे प्रमुख त्यांचे स्वागत करतात. बँडवर राष्ट्रगीताचे वादन होते. मोठी कवायत केली जाते. त्यावेळेस रणगाडे, तोफा, रॉकेट्स आदी युद्धसामुग्रीचे भव्य प्रदर्शन केले जाते. आपला भारत विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांतील संस्कृतीचे प्रदर्शन करणा-या रथयात्रांची भव्य मिरवणूक ह्या प्रसंगी आयोजित केली जाते. शाळेतील मुले त-हेत-हेची नृत्ये, व्यायाम आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. शौर्य गाजवणा-या मुलामुलींचा ह्या वेळेस गौरव केला जातो. तसेच ह्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे अनेक पुरस्कारही दिले जातात.

देशात लोकशाही असणे हा नागरिकांना मिळालेला खूप मोठा हक्क आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो, लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. ते बलिदान आपण व्यर्थ जाऊ देता कामा नये. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले सरकार असते. आम्हाला आमचा देश प्रगतीपथावर न्यायचा आहे. सर्व भारतीयांची प्रगती करायची आहे. प्रजासत्ताक दिन हे त्याचेच प्रतिक आहे.

ह्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. सरकारी आस्थापनांमध्ये आणि शाळांमध्ये ध्वजवंदन होते. आमच्या शाळेतही दर वर्षी २६ जानेवारीला ध्वजवंदनाचा सोहळा होतो. त्या दिवशी कुणातरी आदरणीय व्यक्तिमत्वाला आमच्या शाळेत पाहुणे म्हणून बोलावले जाते. त्यांच्या हस्ते शाळेत घेतलेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कारही दिले जातात. मला नेहमी निबंधात बक्षिस मिळते म्हणून मी ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहातो.

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 300 शब्द – Republic Day Essay in Marathi 300 Words

भारतात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण व उत्सव साजरे केले जातात. पण काही सण असे असतात की ज्यांचा संबंध राष्ट्र आणि त्यातील निवासी यांच्याशी असतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० पासून भारताने आपली नवी घटना लागू केली. स्वत:चे स्वतंत्र सरकार, राष्ट्रपती, ध्वज यांची निर्मिती झाली. भारत जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक बनले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपाविण्यात आली.

या दिवशी सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. सकाळी ७ वाजता राष्ट्रपती विजय चौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतींचे स्वागत करतात. तिरंगी झेंडा फडकविल्यानंतर तिन्ही सेनेच्या तुकड्या सलामी मंचाकडे जातात. बँडवर सैनिक राष्ट्रीय संगीत वाजवितात. घोडे व उंटावर स्वार झालेल्या सैनिकांच्या तुकड्या येतात. भारतात तयार करण्यात आलेले रणगाडे, तोफा, रॉकेट आदींचे प्रदर्शन केले जाते. भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. शालेय विद्यार्थी त हेत-हेची नृत्ये, व्यायाम, आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. विविधतेत एकता दाखविणारे देखावे निघतात. या देखाव्यांत त्या त्या राज्यांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक झलक असते. शौर्य गाजविणाऱ्या मुला-मुलींचा सन्मान केला जातो. साडेअकरा वाजता लाल किल्ल्यावर परेडचे विसर्जन होते. आकाशातून विमाने पुष्पवृष्टी करतात.

सर्व राज्यांत प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा केला जातो. त्याठिकाणी राज्यपाल सलामी घेतात आणि प्रादेशिक वेशभूषेत नृत्यगायन होते. शाळेतील मुलेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. सरकारी कार्यालयांवर रोषणाई केली जाते. राष्ट्रपती भवन, संसद, सचिवालय विजेच्या रोषणाईत न्हाऊन निघतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. राष्ट्रपती रात्री देशी-विदेशी अतिथींना मेजवानी देतात. या दिवशी शासकीय व अशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा होतात.

प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण विचार केला पाहिजे की आपण काय गमावले आणि काय मिळविले! आपण राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता, आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 400 शब्द – Republic Day Essay in Marathi 400 Words

भारतात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण उत्सव साजरे केले जातात. पण पर्व असे असतात की ज्यांचा संबंध राष्ट्र आणि त्यातील निवासी यांच्याशी असतो. दिन, प्रजासत्ताक दिन हे असे पर्व आहेत.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला इंग्रज सरकारचे प्रतिनिधी म्हणून लॉर्ड माऊंटबॅटन भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. २६ जानेवारी १९५० पासून भारताने आपली नवी घटना लागू केली. स्वत:चे स्वतंत्र सरकार, राष्ट्रपती, ध्वज यांची निर्मिती झाली. भारत जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक बनले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपाविण्यात आली.

२५ जानेवारीच्या संध्याकाळी राष्ट्रपती राष्ट्राच्या नावे एक संदेश देतात, जो सर्व प्रसार माध्यमे, रेडिओ, दूरदर्शनवरून प्रथम हिंदी व नंतर इंग्रजीतून प्रसारित होतो. सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. सकाळी ७ वाजता राष्ट्रपती विजय चौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतीचे स्वागत करतात. तिरंगी झेंडा फडकविल्यानंतर तिन्हा सेनेच्या तुकडज्या सलामी मंचाकडे जातात. बँडवर सैनिक राष्ट्रीय संगीत वाजवितात. घोडे व उंटावर स्वार झालेल्या सैनिकांच्या तुकड्या येतात. भारतात तयार करण्यात आलेले रणगाडे, तोफा, रॉकेट आदींचे प्रदर्शन केले जाते. ज्यावरून भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अंदाज लावता येतो. शालेय विद्यार्थी तहेत-हेची नृत्ये, व्यायाम, आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. विविधतेत एकता दाखविणारे देखावे निघतात. या देखाव्यांत त्या त्या राज्यांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक झलक असते, प्रत्येक राज्य आपापले नृत्यप्रकार सलामी मंचावर सादर करते.

हे सर्व कार्यक्रम पाहून स्वर्ग धरतीवर अवतरल्याचा भास होतो. शौर्य गाजविणाऱ्या बालकांची स्वारी हत्तीवर येते. प्रेक्षक हात हलवून त्यांचे कौतुक करतात, प्रेक्षक सकाळी ९ वाजल्यापासूनच हे सर्व पाहण्यासाठी येऊ लागतात. ७ वाजेपर्यंत खूप गर्दी जमा होते. साडेअकरा वाजता लाल किल्ल्यावर जाऊन परेड चे विसर्जन होते. आकाशातून विमाने पुष्पवृष्टी करतात. तर काही विमाने आकाशत इंद्रधनुष्य बनून उडून जातात.

सर्व राज्यांत प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा केला जातो. त्याठिकाणी राज्यपाल सलामी घेतात. आणि प्रादेशिक वेशभूषेत नृत्यगायन होते. शाळेतील मुलेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात.

प्रजासत्ताकदिन अवर्णनीय असतोच. रात्री पण सरकारी कार्यालयांवर रोषणाई केली जाते. राष्ट्रपती भवन, संसद, सचिवालय विजेच्या रोषणाईत न्हाऊन निघतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. राष्ट्रपती रात्री देशी-विदेशी अतिथींना मेजवानी देतात.

या दिवशी शासकीय व अशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. शाळा-महाविद्यालयांत एक दिवस आधी सांस्कृतिक कार्यक्रम,खेळांच्या स्पर्धा होतात. प्रवाशांना मिठाई वाटतात.

आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण विचार केला पाहिजे की आपण काय गमावले आणि काय मिळविले! आपल्याला काय हवे! आपल्या योजना यशस्वी होऊन उद्दिष्टांपर्यंत पोहोचत असताना आपण राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता, आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 500 शब्द – Republic Day Essay in Marathi 500 Words

स्वातंत्र्यादिन आणि प्रजासत्ताकदिन हे दोन मोठे राष्ट्रीय समारंभ आहेत. स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टला तर प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा केला जातो. संपूर्ण राष्ट्र मोठ्या उत्साहाने हे दिवस साजरे करते. आपल्या इतिहासाची आणि हौतात्म्य स्वीकारलेल्या वीरांची आठवण देश करतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी यादिवशी नवे संकल्प केले जातात.

२६ जानेवारी १९५० ला भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि घटना लागू करण्यात आली. प्रजासत्ताकदिनाची कहाणी मोठी आहे. याचा इतिहास १९२९ साली झालेल्या लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनापासून सुरू होतो. या अधिवेशनाचे पं. नेहरू अध्यक्ष होते. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव यात पास करण्यात आला. याच दिवशी रात्री बारा वाजता रावी नदीच्या किनाऱ्यावर नेहरूंनी स्वावंत्र्याचा ध्वज फडकविला. देशाला उद्देशून संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करण्याची घोषण केली. हा दिवस २६ जानेवारी होता. त्यादिवशी सर्व प्रतिनिधींनी एका स्वरात भारतमातेला गुलामगिरीच्या साखळ्यांतून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. अशा प्रकारे हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय बनला. त्यानंतर दरवर्षी २६ जानेवारीला भारतीय जनता या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करीत राहिली. ज्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला उत्तेजन व गती मिळाली, देशप्रेम आणि देशभक्तीने झंझावाताचे रूप घेतले. १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ चळवळीचा श्रीगणेशा करण्यात आला. शेवटी इंग्रजांना इथून जावेच लागले व देश स्वतंत्र झाला.

देशाच्या घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली ती २६ जानेवारी १९५० ला पूर्ण झाली. त्यानंतर भारत प्रजासत्ताक घटक राज्य बनले. त्याला सार्वभौमत्व मिळाले. त्याने लोकशाही शासनपद्धतीचा स्वीकार केला. संपूर्ण भारतात प्रसन्नता व संपूर्ण स्वातंत्र्याची एक लाट आली. लोकांनी २६ जानेवारीला त्याचे समारंभ साजरे केले. २६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. सर्व संस्था, खाजगी व सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज इत्यादी बंद असतात. २५ जानेवारीला संध्याकाळी राष्ट्रपती रेडिओ व दूरदर्शनच्या माध्यमातून संपूर्ण देशाला उद्देशून संदेश देतात. तो हिंदी व इंग्रजीत असतो. या प्रसंगी वृत्तपत्रे, मासिकांचे विशेष अंक प्रकाशित होतात. ठिकठिकाणी ध्वजारोहण व विशेष कार्यक्रम सादर केले जातात. संपूर्ण राष्ट्रात एक उत्साहाचे वातावरण असते. २६ जानेवारीला सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर राजपथावर शानदार कार्यक्रमाला प्रारंभ होतो.

राष्ट्रपती जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचे स्वागत उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख करतात. ध्वजारोहण होते आणि नंतर सेनेच्या तिन्ही विभागांच्या तुकड्यांची परेड होते. राष्ट्रपती त्यांची सलामी घेतात. बँडवर राष्ट्रीय धून वाजविली जाते त्यानंतर भारतात तयार झालेल्या तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन होते. आपल्या सैन्याच्या तयारीची आपणास एक झलक पाहावयास मिळते. शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. नंतर वेगवेगळ्या राज्यांच्या आकर्षक शोभायात्रा निघतात. त्यातून राष्ट्रीय ऐक्य, संस्कृती, इतिहास आणि समृद्धीचे दर्शन घडते. प्रादेशिक लोकनृत्ये सादर केली जातात. हा सर्व कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा असतो. हजारो लोक हे सर्व पाहण्यासाठी आलेले असतात. आकाशवाणी व दूरदर्शनवर त्याचे प्रत्यक्ष प्रसारण केले जाते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. असे वाटते जणू दिवाळीच आहे.

राजधानी दिल्लीखेरीज इतर राज्यांच्या राजधान्या, शहरे, गावे सर्वत्र प्रजासत्ताकदिन धूमधडाक्याने साजरा केला जातो. प्रांतांच्या राजधान्यांत राज्यपाल परेडची सलामी घेतात. शाळा, कॉलेज, संस्था इ. ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. सर्व सरकारी इमारतींवर तिरंगा फडकविण्यात येतो. या उत्साह व उत्सवाबरोबर हा दिवस आमच्या चिंतनाचा पण आहे. तो आपणास ही प्रेरणा देतो की आपण आपल्या भारताला अधिक सुदृढ़, सुखी, समृद्ध आणि उन्नत बनविले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागला पाहिजे. आपली त्याग आणि बलिदानाची परंपरा नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. खरोखरच हा एक अविस्मरणीय दिवस असतो. राष्ट्रीय उत्सव, मेळा असतो. ज्यात सर्व वर्ग जाती, धर्माचे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहाने भाग घेतात. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय ऐक्य, भावनात्मकता, अखंडतेला बळ मिळते. भारतात इतरही अनेक उत्सव होतात पण २६ जानेवारी एकमेवच. परदेशांत भारतीयांखेरीज इतर परदेशी लोक पण हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या प्रसंगी इतर राष्ट्रांचे प्रतिनिधी विशेष पाहुणे पण हजर असतात. ते आपल्याबरोबर या दिवसाच्या आठवणी घेऊन जातात.

  • नवीन वर्ष निबंध मराठी
  • पावसाळा निबंध मराठी
  • मानव आणि पर्यावरण
  • पर्यावरण निबंध मराठी
  • माझा आवडता प्राणी सिंह
  • माझा आवडता प्राणी गाय
  • माझा आवडता प्राणी कुत्रा
  • माझा आवडता प्राणी निबंध
  • माझा आवडता प्राणी हत्ती निबंध
  • माझा आवडता पक्षी पोपट
  • पोपट पक्षी माहिती मराठी
  • शिवाजी महाराज निबंध मराठी 
  • माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
  • माझी मायबोली मराठी निबंध
  • माझा महाराष्ट्र निबंध मराठी
  • माझे आजोळ निबंध मराठी
  • स्वतःवर निबंध मराठी
  • माझी बहिण निबंध
  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझी आई निबंध मरा ठी
  • दिवाळी सणाची माहिती मराठीत
  • दिवाळी निबंध मराठी
  • माझे आजोबा निबंध मराठी
  • माझी आजी निबंध मराठी 
  • माझे बाबा निबंध मराठी
  • मी पाहिलेला अपघात निबंध
  • माझा आवडता खेळ निबंध

FAQ: प्रजासत्ताक दिनी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न.१ आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो.

उत्तर- आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करतो कारण तो दिवस भारतीय संविधान लागू झाला होता.

प्रश्न.२ प्रजासत्ताक दिन कितवा आहे?

उत्तर- २०२२ हे वर्ष भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाईल.

प्रश्न.३ भारताची राज्यघटना कोणत्या वर्षी तयार झाली?

उत्तर- अधिकृत भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० रोजी देशाला सादर करण्यात आले.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

read in marathi logo

Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये

प्रजासत्ताक दिन निबंध, 26 जानेवारी निबंध (Republic Day Essay In Marathi, 26 January Essay In Marathi, Essay On Republic Day In Marathi, Gantantra Diwas In Marathi)

Republic Day Essay In Marathi म्हणजे प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिवस या विषयावर मराठी निबंध येथे मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.

प्रजासत्ताक दिन या विषयावर लिहिलेले हे मराठी निबंध मुलांसाठी १,२,३,४,५,६,७,८,९,१०, आणि ११,१२ वर्ग आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले आहे. Republic Day Essay In Marathi हा निबंध आपल्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी वापरू शकता. या वेबसाइटवर आपल्याला इतर विषयांवर मराठीमध्ये निबंध सापडतील, जे आपण वाचू शकता.

प्रजासत्ताक दिन निबंध | Republic Day Essay In Marathi

२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन, हिंदीमध्ये याला भारतीय गणतंत्र दिवस आणि इंग्रजीत रिपब्लिक डे ऑफ इंडिया असे म्हटले जाते. आपण वर्षभरामध्ये अनेक राष्ट्रीय सण साजरे करतो त्यांपैकी महत्वाचे तीन राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), गांधी जयंती (२ ऑक्टोबर) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी). खरं पाहायला गेलं तर अनेक जणांना स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) यातील फरकच कळत नाही.

आज आपण पाहुयात कि प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमकं काय? आणि आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो? सर्व भारतीयांसाठी हा राष्ट्रीय सण खूप महत्वाचा आणि अभिमानाचा आहे. खरतर २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनालाच स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायला पाहिजे. कारण १५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत देश स्वतंत्र झाला खरं परंतु आपण अजूनही इंग्रजांचे कायदे कानून पाळत होतो. २६ जानेवारी १९५० ला संविधान समितीने आपलं स्वतःचं संविधान बनवून संपूर्ण भारतात लागू केलं. २६ जानेवारी १९५० लाच भारतातील सर्व राज्यांनी भरतीय राज्यघटना स्वीकारली आणि अंमलात आणली. 

प्रजासत्ताक चा अर्थ म्हणजे प्रजेने, प्रजेचे, प्रजेसाठी चालवलेले राज्य. १५ ऑगस्ट १९५० ला जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारी १९५० ला खरं प्रजेचं राज्य आलं असं म्हणता येईल. या दिवसापासूनच प्रजेची सत्ता सुरु झाली. म्हणून २६ जानेवारी हा महत्वाचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

प्रजासत्ताक दिनाचा आपण थोडक्यात इतिहास पाहुयात

इ.स. १६०० मध्ये इंग्रज भारतात आले. सुरुवातीला इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडे फक्त व्यापार करण्याचा अधिकार होता. व्यापार करत असतानाच इ.स. १७६५ मध्ये इंग्रजांनी बंगाल, बिहार, आणि ओरिसा या क्षेत्रांचे महसूल व दिवाणी न्यायाचा अधिकार मिळवले. तेव्हापासून इंग्रजांना सत्ता करण्याची लालसा वाढू लागली. हळूहळू इंग्रजांनी संपूर्ण भारतावर त्यांची सत्ता प्रस्थापित केली. इ.स. १८५७ च्या उठावामुळे ब्रिटिश राजघराण्याने भारतातील सत्तेची जबाबदारी त्यांच्याकडे घेतली. ब्रिटिश राजघराण्याची हि सत्ता भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत चालू राहिली. भारत स्वतंत्र झाला परंतु भारतीयांना राज्यव्यवस्था चालवण्यासाठी राज्यघटनेची गरज भासू लागली. त्यामुळे संविधान सभा स्थापन करण्यात आली. सुमारे २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना अस्तित्वात आली आणि सर्वांच्या संमतीने ती अमलात आणली गेली. या दिवसालाच आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

हा महत्वाचा राष्ट्रीय सण कसा साजरा केला जातो किंवा याच स्वरूप कसं असतं ते आपण पाहुयात

प्रजासत्ताक दिन हा सण २६ जानेवारी या दिवशी संपूर्ण भारत देशात विशेषतः देशातील सर्व राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून आणि राष्ट्रगीत गाऊन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालये यांची सजावट केली जाते. या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, परेड्स, कवायती असे अनेक कार्यक्रम घेतले जातात. एनसीसी आणि स्काऊट चे विद्यार्थी सुंदर कवायती आणि कसरती करून दाखवतात. तसेच या दिवशी अनेक विशेष कामगिरी करणाऱ्या लोकांना सन्मान, पदके आणि बक्षिसे वितरित केली जातात. अनेक शाळांमध्ये लहान मुलांना खाऊ वाटप केले जाते. 

शाळा आणि महाविद्यालयातील मुलांना या सणाचं विशेष आकर्षण असतं. कारण प्रजासत्ताक दिन जवळ आला म्हणजे आठवडा भर आधीपासूनच तय्यारी सुरु होते. शाळा स्वच्छ करणे आणि सजवणे, आपापले वर्ग सजवणे याची मजाच वेगळी असते. अनेक खेळ आणि स्पर्धा यांचं आयोजन केलं जातं. सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर त्यांचीही तयारी आठवडा भर आधीपासूनच केली जाते. प्रजासत्ताक दिना दिवशी अनेक ठिकाणी तर सकाळी सकाळीच प्रभात फेऱ्या काढल्या जातात. सर्व लहान मोठी मुलं तिरंगा ध्वज हातात घेऊन मोठ्या उत्साहात या प्रभात फेरीत सहभागी होतात आणि भारत मातेचा जयघोष करतात. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी खूप कष्ट घेतले, ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या नावाचे नारे लावले जातात. जनजागृती विषयक नारेसुद्धा या प्रभातफेरीमध्ये लावले जातात. 

प्रजासत्ताक दिन म्हटलं कि प्रमुख आकर्षण असतं ते म्हणजे देशाची राजधानी दिल्ली मध्ये साजरा होणारा प्रजासत्ताक दिन. दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. संपूर्ण देशातून महत्वाचे मंत्री, अनेक दिग्गज व्यक्ती, मान्यवर लोक तिथे उपस्थित होतात. जर वर्षी या दिवशी परदेशातील कोणत्याही एका राष्ट्रप्रमुखाला किंवा अतिमहत्वाच्या मंत्र्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले जाते. दिल्लीतील प्रजासत्ताक दिन आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला जातो. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरूनच देशाला संबोधित करत भाषण करतात. या भाषणात पंतप्रधान वर्षभर घडलेल्या घटना, पार पडलेली कामे, तसेच भविष्यात काय करणार आहोत याबद्दल सांगतात. त्याचबरोबर काही योजना आणायच्या असतील तर त्याही पंतप्रधान याच दिवशी घोषित करतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनादिवशी होणाऱ्या पंतप्रधानांच्या या भाषणाला खूपच महत्व आहे. भाषणानंतर अनेक सन्मान, पारितोषके, विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींना पदके वितरित केली जातात. 

हे सगळं झाल्यावर मग येतो तो महत्वाचा भाग ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो. देशाच्या तिन्ही दलातील जवानांच्या परेड्स आणि कवायती. खरतर हे पाहण्यासाठीच तर आपण सर्व जण टीव्हीला अक्षरशः डोळे लावून बसलेलो असतो. तिन्ही दलातील जवान एका मागोमाग रांगेत अतिशय शिस्तीत परेड्स करत येतात. प्रत्येक टीमचं नेतृत्व त्यांचे प्रमुख करत असतात. प्रत्येक टीम पंतप्रधानांच्या समोर येऊन त्यांना सलाम करून पुढे निघून जाते. खरतर हे एक प्रकारचं शक्तिप्रदर्शनच असतं. या जवानांची शिस्त आणि त्यांचा जोश, उत्साह बघून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आता तर महिला जवानांची टीम सुद्धा या परेड्स मध्ये सहभागी होत आहे त्यांचं नेतृत्व सुद्धा महिला अधिकारिच करत असतात. हि आपल्यासाठी खूपच सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. 

आर्मीतील जवान अनेक कसरती करतात मोटारसायकल वरील कसरती , घोड्यावरील कसरती करतात. या कसरतीमध्येसुद्धा महिला जवान मागे राहिल्या नाहीत त्यासुद्धा पुरुष जवानांच्या खांद्याला खांदा लावून श्वास रोखून पाहावं अश्या कसरती करतात. त्यानंतर वेळ येते ती देशाकडे असणाऱ्या युद्धसामग्रीच प्रदर्शन. यामध्ये अनेक प्रकारचे रणगाडे, तोफा, मिसाईल्स, युद्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या गाड्या, शस्त्रे, क्षेपणास्त्रे यांचं प्रदर्शन केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारची विमाने, हेलिकॉप्टर्स, कमी पल्ल्याची, लांब पल्ल्याची मिसाईल्स दाखवले जातात. विमानांनी सादर केलेल्या कसरती खूपच मनमोहक असतात.

यात आणखी एक महत्वाचं मनमोहक दृश्य असतं ते म्हणजे वेगवेगळ्या राज्यांनी प्रदर्शित केलेले देखावे. प्रत्येक राज्य यादिवशी दिल्लीत एक देखावा सादर करत असतो. या देखाव्यामध्ये आपापल्या राज्याची संस्कृती दाखवली जाते. या देखाव्यांना इतक्या सुंदर प्रकारे सजवलेले असते कि ते इतके मनमोहक आणि जिवंत असल्यासारखे  दिसतात. या सर्व राज्यांच्या देखाव्यामधून सर्वात चांगल्या देखाव्याचा पहिला नंबर देखील काढला जातो आणि त्यांना बक्षीस दिल जातं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमध्ये अक्षरशः भारताच्या सर्व क्षेत्रातील आणि विविध राज्यातील सांस्कृतिक वैभवाचे दर्शनच घडवले जाते.

अशा प्रकारचे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे जनतेच्या मनातील राष्ट्र भावना उसळून आणि उजळून निघते आणि आपलं आपल्या देशावरचं प्रेम वाढत जातं. पण फक्त आनंदात आणि उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला म्हणजे आपण देशावर खूप प्रेम करतो असं नाही, इथेच आपली जबाबदारी संपत नाही. खरंतर या दिवशी आपण देशहितकारक कार्ये करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे आणि संविधानामध्ये सांगिल्याप्रमाणे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचं पालन केलं पाहिजे.

भारताच्या संविधानात नागरिकांसाठी दिलेले मूलभूत कर्तव्ये खालीलप्रमाणे:

मूलभूत कर्तव्ये – प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल कि त्याने – 

  • प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. 
  • स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे 
  • देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे          
  • आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी 
  • सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा 
  • आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे 
  • नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी 
  • वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी 
  • सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा 
  • देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा 
  • ६ ते १४ वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनीशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात

अशा पदधतीने आज आपण प्रजासत्ताक दिन या विषयावर मराठी निबंध बघितला आहे. आशा आहे की आम्ही दिलेल्या निबंधाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली मराठी निबंध आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह नक्की Share करा.

आपल्याला Republic Day Essay In Marathi या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर कोणत्याही विषयावर मराठी निबंध हवा असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

अधिक वाचा :

  • 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

Related Posts

Swachh Bharat Abhiyan Essay In Marathi featured image

स्वच्छ भारत अभियान वर मराठी निबंध Swachh Bharat Abhiyan Essay In Marathi

Plastic Shap Ki Vardan Essay In Marathi heading featured image

प्लास्टिक शाप की वरदान वर मराठी निबंध Plastic Shap Ki Vardan Essay In Marathi

Leave a comment cancel reply.

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Nibandh

प्रजासत्ताक दिवस मराठी निबंध - 26 जानेवारी निबंध मराठी - 26 January Republic Day Essay in Marathi - Republic Day Nibandh in Marathi

ADVERTISEMENT

26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन (26 January Republic Day)

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर, इ.स. 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी इ.स. 1950 रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी 26 जानेवारी इ.स. 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.

आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’ आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो 26 जानेवारीला.

हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजपासून कवायती. भाषणे विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो.

15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. परवशतेचे पाश तुटले आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे.

दरवर्षी 26 जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. हा राष्ट्रीय सण प्रत्येक भारतवासीय मोठा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करतो.

Nibandh Category

Learning Marathi | All Information in Marathi

Republic Day Essay In Marathi | प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध

Republic Day Essay In Marathi

Republic Day Essay In Marathi : भारत दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि लोकशाहीचा स्वीकार केला तो दिवस. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ज्या दिवशी आपली राज्यघटना अंमलात आली तो दिवस साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी, स्वातंत्र्यानंतरच्या जवळपास 3 वर्षांनी आपण एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष , समाजवादी, लोकशाही प्रजासत्ताक बनलो.

आम्ही खाली प्रजासत्ताक दिनाचा निबंध मराठीत दिला आहे. निबंध सोप्या मराठी भाषेत लिहिण्यात आले आहेत जेणेकरून ते आवश्यकतेनुसार सहज लक्षात राहतील आणि सादर करता येतील.

Table of Contents

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध | Republic Day Essay In Marathi

भारतात दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून भारतीय लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यापासून सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असण्याच्या महत्त्वाचा गौरव करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. हा दिवस संपूर्ण देशभरात भारत सरकारने राजपत्रित सुट्टी म्हणून घोषित केला आहे. संपूर्ण भारतातील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांद्वारे तो साजरा केला जातो. आपण भारतासारख्या प्रजासत्ताक आणि लोकशाही देशाचे नागरिक आहोत आणि जिथे प्रत्येकाला समान अधिकार आहेत, याचा आपण सर्वांना अभिमान असायला हवा.

प्रजासत्ताक दिनाचे महत्व

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हृदयात आहे. हा भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक आहे जो प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करतो. तरुण पिढीला आपल्या महान भारतीय इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून देण्यास मदत करणारा हा एक प्रसंग आहे.

हा तो दिवस आहे जेव्हा आपण आपल्या महान नेत्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करतो ज्यांनी देशासाठी बलिदान दिले. प्रजासत्ताक दिन आपल्याला एकतेचे महत्त्व आणि अधिक शक्तिशाली ब्रिटीश साम्राज्याचा पराभव करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कशी मदत केली हे देखील शिकवतो.

एकही शस्त्र न उचलता किंवा रक्ताचा एक थेंबही न सांडता आपण अधिक शक्तिशाली शत्रूचा पराभव कसा करू शकतो हे महात्मा गांधींची अहिंसा चळवळ आपल्याला शिकवते. प्रजासत्ताक दिन आपल्याला हे देखील लक्षात ठेवतो की देशातील सर्व नागरिक संविधानासाठी समान आहेत आणि जात, पंथ किंवा धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव नाही.

प्रजासत्ताक दिनाचा उत्सव

२६ जानेवारी हा भारतासाठी गौरवशाली दिवस आहे. या दिवशी देशभरात विशेष कार्यक्रम होतात. शाळा, कार्यालये आणि सर्व महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्याचा कार्यक्रम आहे. यामध्ये मुले उत्साहाने सहभागी होतात. लोक एकमेकांचे अभिनंदन करतात. शाळकरी मुले जिल्हा मुख्यालय, प्रांतीय राजधानी आणि देशाच्या राजधानीत परेडमध्ये सहभागी होतात. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. लोकनृत्य, लोकगीते, राष्ट्रीय गीते आणि विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात. देशाच्या प्रगतीचे मूल्यमापन देशवासी करतात. हा सण आम्हा भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या संविधानाचे महत्त्व सांगणारा हा दिवस आहे.

15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी भारताला खरे अस्तित्व 26 जानेवारीलाच मिळाले. २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा सण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या देशाचे संविधान आणि त्याचे प्रजासत्ताक स्वरूप आपल्या देशाला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जोडते. जगाच्या नकाशावर प्रजासत्ताक म्हणून आपला देश प्रस्थापित झाला तो दिवस. या दिवशी आपण सर्व नागरिकांनी प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपण भारतीय राज्यघटनेची प्रतिष्ठा राखू. आम्ही त्याचे रक्षण करू आणि शांतता आणि सौहार्द राखू आणि देशाच्या विकासाला हातभार लावू.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सवासाठी विशेष व्यवस्था केली जाते आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण आणि राष्ट्रगीताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात होते. एवढेच नाही तर यानंतर तिन्ही सैन्यांची परेड होते. जी साधारणपणे विजय चौकापासून सुरू होते आणि इंडिया गेटवर संपते. या दरम्यान, राष्ट्रपतींना तिन्ही भारतीय सैन्य (जमीन, जल आणि हवा) द्वारे सलामी दिली जाते. याशिवाय लष्कराकडून आधुनिक शस्त्रास्त्रे आणि रणगाडेही प्रदर्शित करण्यात आले आहेत. जे आपल्या राष्ट्रीय शक्तीचे प्रतीक आहे. एवढेच नव्हे तर राज्यांच्या चित्रांचे प्रदर्शन, पुरस्कार वितरण, मार्चपास्ट आदी उपक्रमही होतात. सरतेशेवटी, संपूर्ण भारताचे वातावरण “जन गण मन गण” ने गुंजते.

प्रजासत्ताक दिनाचा इतिहास

दरवर्षी 26 जानेवारीला भारत प्रजासत्ताक दिन आनंदाने साजरा करतो. हा विशेष दिवस 1950 मध्ये त्या क्षणाला चिन्हांकित करतो जेव्हा भारताची राज्यघटना लागू झाली, पूर्वीच्या भारत सरकार कायद्याची (1935) जागा घेऊन आणि अधिकृतपणे देशाला स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून घोषित केले.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाचा कारभार ‘भारत सरकार कायदा 1935’ द्वारे करण्यात आला. देशासाठी राज्यघटनेच्या आवश्यकतेमुळे 28 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची नियुक्ती करण्यात आली ज्याचे अध्यक्ष डॉ. बी.आर. आंबेडकर. मसुदा समितीने हा मसुदा संविधान सभेला सादर केला जो 26 नोव्हेंबर 1949 रोजी (दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो) स्वीकारण्यात आला आणि 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आला.

भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी साजरा करण्यात आला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी इर्विन स्टेडियम (आताचे मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम), दिल्ली येथे राष्ट्रध्वज फडकावला आणि त्यानंतर राष्ट्रगीत गायले गेले. पहिल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती डॉ. सुकर्णो आणि त्यांच्या पत्नी होत्या. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सशस्त्र दलाची सलामी घेतली आणि ही ऐतिहासिक घटना 15000 हून अधिक लोकांनी पाहिली.

प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आपण आपल्या भारत देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करू आणि सदैव एकजूट राहू. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी पाहिलेले भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न आपल्याला कोणत्याही किंमतीत पूर्ण करावे लागेल. हीच प्रजासत्ताकाची खरी ओळख असेल.

हेही वाचा –

Republic Day Speech in Marathi Republic Day Slogan In Marathi Makar Sankranti Essay in Marathi Essay On Swachh Bharat Abhiyan in Marathi

आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो?

भारताची राज्यघटना लागू झाल्याचा दिवस म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो.

भारताचे संविधान कोणत्या वर्षी तयार झाले?

26 जानेवारी 1950 रोजी अधिकृत भारतीय संविधान देशाला सादर करण्यात आले.

प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा का आहे?

प्रजासत्ताक दिन विद्यार्थ्यांना भारताची लोकशाही आणि तिची मूल्ये, प्रेरणादायी देशभक्ती आणि नागरिकत्व याबद्दल शिकवतो.

प्रजासत्ताक दिनाचा निबंध कसा लिहायचा?

प्रजासत्ताक दिनाचा निबंध लिहिण्यासाठी, परिचयाने सुरुवात करा, त्याचे महत्त्व चर्चा करा, प्रमुख घटनांचा उल्लेख करा आणि लोकशाही आणि एकात्मता टिकवून ठेवण्याचे महत्त्व सांगून समाप्ती करा.

नमस्कार मित्रांनो माझे नाव “Rajesh Pahan” आहे मी learningmarathi.in वेबसाइटचा संस्थापक आहे. मी गेली ३ वर्षे ब्लॉगिंग करत आहे, ही वेबसाईट बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की मी मराठीत सर्व लोकांना योग्य माहिती देऊ शकेन.

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

  • असे झाले तर
  • वर्नात्मक
  • मनोगत
  • प्राणी
  • अनुभव

Republic day 26 January essay in Marathi | गणतंत्र दिवस मराठी निबंध.

२६ जानेवारीला संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण असते कारण संपूर्ण भारतात गणतंत्र दिवस साजरा केला जातो ज्याला Republic day हि म्हंटल जाते, तर आज २६ जानेवारी निमित्त मराठी निबंध आपल्या साठी गणतंत्र दिवस हा मराठी निबंध घेऊन आला आहे. तर चला मित्रांनो ह्या मराठी निबंधाला सुरवात करूया.

This image is of indian flag which is used to show 26 january republic day of india in marathi essay

२६ जानेवारी गणतंत्र दिवस.

२६ जानेवारी ह्या दिवशी आपल्या भारत देशात गणतंत्र दिवस साजरा केला जातो. गणतंत्र दिवसाला प्रजासत्ताक दिन किंव्हा इंग्रजी मदे रिपबलिक डे हि म्हंटल जाते. ह्या दिवशी संपूर्ण भारत भर लोकांन मदे खूप उत्साह असतो आणि सर्व लोक प्रजातंत्र दिवस खूप आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात.

आपल्या देशात इंग्रजांचे राज्य होते आणि तेव्हा आपण सर्व इंग्रजांच्या गुलामी मदे राहत होते तेव्हा भारता मदे भारताला स्वतंत्र मिळवण्या साठी हालचाली सुरु झाल्या आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला.

मग २६ जानेवारी १९५० ला आपल्या देशात आपले कायदे लागू झाले आणि आपण पूर्ण पने स्वतंत्र झालो आणि आपल्या जनतेचे राज्य सुरु झाले आपण इंग्रजांच्या गुलामी मधून मुक्त झालो. म्हणून २६जानेवारीला गणतंत्र दिवस बनवला जातो.

संपूर्ण भारता मदे दर वर्षी हा गणतंत्र दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो ह्या दिवशी सर्व शाळेन मदे कार्यक्रम असतात सगळी कडे आपल्या झेंड्याचे वंदन केले जाते, राष्ट्रगीत म्हंटले जाते. आपल्या देशाची राजधनी म्हणजेच दिल्लीच्या लाल किल्यावर मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो.

२६ जानेवारीला टिवी वर लाल किल्ल्यावर सुरु असलेल्या कार्यक्रमा चे प्रसारण सुरु असते. तिथे खूप लोक हजार असतात, तिथे आपल्या भारतीय सेने चे प्रदर्शन दाखवले जाते तिथे सुरु असलेली सेनेची परेड बगून मन भरून येते. वायू सेना विमानाने करतब दाखवते आणि हवे मदे धुराने तिरंगा तयार करते आणि तिथे अशेच वेग वेगळे कार्यक्रम असतात ते पाहण्या साठी जग भरून लोक येतात.

आमच्या शाळेत २६ जानेवारीला आम्ही सर्व शाळेत एकदम साफ सफेद रंगाचे कपडे घालून जातो आणि आपल्या झेंड्याचे वंदन करतो सर्व एक सुरात राष्ट्रगीत म्हणतात मग शाळे मदे देश भक्तीचे कार्यक्रम होतात आणि प्रजातंत्र दिना निमित्त भाषणे दिली जातात शाळेत खूप उत्साहाचे वातावरण असते, मग आम्ही भारताची शान वाढऊ अशी शपत घेतो.

आम्ही संपूर्ण दिवसभर आपल्यला तिरंग्याचे बिल्ले शर्ट वर लावतो आणि अपना भारता मदे राहतो ह्याचे गर्व करतो. असा आनंदाने आणि उत्साहाने आम्ही आमचा गणतंत्र दिवस साजरा करतो.

समाप्त

तर मित्रांनो तुम्ही प्रजातंत्र दिनाला काय करता आणि तुमच्या शाळे मदे गणतंत्र दिवसा मिमित्त काय करतात आम्हाला खाली comment करून सांगा.

२६ जानेवारी गणतंत्र दिवस हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयावर पण वापरला जाऊ शकतो.

  • प्रजातंत्र दिवस .
  • तुम्ही साजरा केलेला गणतंत्र दिवस.
  • २६ जानेवारी निबंध.
  • प्रजासत्ताक दिन.

धन्यवाद

तर मित्रांनो आपल्यांना हा निबंध कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हला खाली comment करून सांगा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 3 टिप्पण्या.

essay on republic day in marathi

nice who wrote these ?

essay on republic day in marathi

Thank you, I have written it

इंग्रजी मध्येच निंबध पाहिजे आहे.

Featured Post

सायकल वर मराठी निबंध.

सायकल वर मराठी निबंध.

नमस्कार विद्यार्थ्यानो आज आम्ही सयकल वार मरठी निबंध घेऊन आले आहोत. सायकल वर ह्या …

Popular Posts

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

[Holi] Marathi Essay on Holi | होळी वर मराठी निबंध.

[Holi] Marathi Essay on Holi | होळी वर मराठी निबंध.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध. Marathi essay on my favourite animal cat.

  • अनुभव 12
  • असे झाले तर 9
  • आवडता ऋतू 1
  • आवडता खेळ 1
  • आवडता पक्षी 1
  • आवडता प्राणी 2
  • आवडता सण 5
  • आवडते फुल 2
  • ऋतू 2
  • काल्पनिक 9
  • चरित्रात्मक 3
  • प्रधुषण 1
  • मनोगत 4
  • माझ गाव 1
  • माझा देश 1
  • माझी आई 3
  • माझी शाळा 3
  • माझे घर 1
  • माझे बाबा 1
  • म्हण 6
  • वर्नात्मक 16
  • व्यक्ती 2
  • समस्या 1
  • Educational Essay 20
  • Important Day' 1

Menu Footer Widget

Republic Day Essay Marathi | Prajasktak Din Nibandh | प्रजासत्ताक दिन निबंध मराठी.

प्रजासत्ताक दिन निबंध.

essay on republic day in marathi

भारताचे संविधान आणि एकता साजरी करणे

प्रजासत्ताक दिन हा भारतातील सर्वात महत्त्वाच्या राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. भारतीय संविधानाचा स्वीकार आणि भारतीय प्रजासत्ताक स्थापन झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस सर्व भारतीयांसाठी देशाची एकता आणि विविधता प्रदर्शित करण्याचा अभिमानास्पद क्षण आहे. या लेखात, आपण प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि त्याचा इतिहास, त्या दिवसाचा उत्सव आणि तो राष्ट्राला कशा प्रकारे एकत्र आणतो याचा शोध घेऊ.

प्रजासत्ताक दिनाचा इतिहास

प्रजासत्ताक दिनाचा इतिहास 26 जानेवारी 1950 चा आहे. या दिवशी, 1935 च्या भारत सरकार कायद्याच्या जागी भारतीय राज्यघटना अंमलात आली. भारतीय संविधानाचा मसुदा एका संविधान सभेने तयार केला होता, ज्याचे अध्यक्ष डॉ. बी.आर. आंबेडकर, दोन वर्षांच्या कालावधीत. 448 कलमे आणि 12 वेळापत्रके असलेली ही जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे आणि त्यात नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये, सरकारची रचना आणि केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधांची रूपरेषा दिली आहे.

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा

भारतभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि उत्साहात साजरा केला जातो. मुख्य उत्सव राजधानी नवी दिल्ली येथे होतो, जिथे राजपथ येथे भव्य परेड आयोजित केली जाते. परेड हा रंग, संस्कृती आणि एकतेचा देखावा आहे, ज्यामध्ये विविध राज्ये आणि सरकारी विभागांद्वारे विविध प्रदर्शने आहेत. लष्करी पराक्रमाचे प्रदर्शन आणि भारतीय वायुसेनेच्या फ्लाय-पास्टने परेडचा समारोप होतो. भारताचे राष्ट्रपतीही परेडमध्ये सहभागी होतात आणि राष्ट्रध्वज फडकावतात.

राष्ट्राला एकत्र आणणे

प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय एकात्मता आणि अभिमानाचा दिवस आहे. हे भारताचा आत्मा साजरे करण्यासाठी सर्व स्तरातील, धर्म आणि संस्कृतीतील लोकांना एकत्र आणते. हा दिवस भारताच्या विविधतेचे आणि लवचिकतेचे प्रतीक आहे आणि तो देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवतो. आपले स्वातंत्र्य सुरक्षित करण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाची आणि आपली लोकशाही आणि घटनात्मक मूल्ये जपण्याच्या महत्त्वाची ही आठवण आहे.

प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

प्रजासत्ताक दिन हा अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम, हे आपल्या लोकशाहीचा कणा असलेल्या भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ आहे. हे नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये निश्‍चित करते आणि सरकारच्या कामकाजाची चौकट ठरवते. दुसरे म्हणजे, आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीसाठी लढलेल्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि नेत्यांनी केलेल्या बलिदानाची ही आठवण आहे. तिसरे म्हणजे, ते भारताची विविधता आणि एकता दर्शवते, जी आपली सर्वात मोठी ताकद आहे.

प्रजासत्ताक दिन हा भारताच्या विविधतेचा आणि एकतेचा उत्सव आहे आणि आपली लोकशाही आणि घटनात्मक मूल्ये जपण्याच्या महत्त्वाची आठवण करून देतो. हा राष्ट्रीय अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आणि तो भारताचा आत्मा साजरा करण्यासाठी सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणतो. आपण हा दिवस साजरा करत असताना, आपल्या पूर्वजांनी आणि नेत्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करूया आणि आपल्या संविधानाच्या आदर्शांप्रती आपली बांधिलकी नूतनीकरण करूया.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यात काय फरक आहे?

A1. स्वातंत्र्य दिन हा ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याचे स्मरण करतो, तर प्रजासत्ताक दिन भारतीय संविधानाचा स्वीकार आणि भारतीय प्रजासत्ताक स्थापनेचा उत्सव साजरा करतो.

Q2. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

A2. २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून निवडला गेला कारण याच दिवशी १९३० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज किंवा ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्य घोषित केले होते.

Q3. प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान काय होते?

A3. प्रजासत्ताक दिन परेड हा रंग, संस्कृती आणि एकतेचा देखावा आहे, ज्यामध्ये विविध राज्ये आणि सरकारी विभागांद्वारे विविध प्रदर्शने आहेत. लष्करी पराक्रमाचे प्रदर्शन आणि भारतीय वायुसेनेचा फ्लाय-पास्ट. भारताचे राष्ट्रपतीही परेडमध्ये सहभागी होतात आणि राष्ट्रध्वज फडकावतात.

Q4. लोक घरोघरी प्रजासत्ताक दिन कसा साजरा करतात?

A4. अनेक लोक घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन प्रजासत्ताक दिन साजरा करतात. काहीजण देशभक्तीपर रंग आणि प्रतीकांनीही आपली घरे सजवतात.

Q5. भारतीय राज्यघटनेचे महत्त्व काय आहे?

A5. भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा कणा आहे आणि त्यात नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये समाविष्ट आहेत. हे सरकारच्या कामकाजाची चौकट ठरवते आणि केंद्र आणि राज्य सरकारमधील संबंध प्रस्थापित करते. लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांप्रती भारताच्या बांधिलकीचे ते प्रतीक आहे.

Q6. प्रजासत्ताक दिन महत्त्वाचा का आहे?

A6. प्रजासत्ताक दिन महत्त्वाचा आहे कारण तो दिवस आहे जेव्हा भारताने आपली राज्यघटना स्वीकारली आणि प्रजासत्ताक बनले. हे एक राष्ट्र म्हणून भारताच्या सार्वभौमत्वाचे, एकतेचे आणि अखंडतेचे प्रतीक आहे. हा एक दिवस आहे जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि नेत्यांनी केलेल्या बलिदानाची आठवण करतो ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष देशाच्या उभारणीसाठी कार्य केले.

Q7. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात शाळा आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका काय आहे?

A7. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात शाळा आणि शैक्षणिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. ते सांस्कृतिक कार्यक्रम, ध्वजारोहण समारंभ आयोजित करतात आणि विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करतात. प्रजासत्ताक दिन आणि भारतीय राज्यघटनेच्या महत्त्वाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक शाळा निबंध लेखन आणि भाषण स्पर्धा आयोजित करतात.

Q8. प्रजासत्ताक दिन आपण अर्थपूर्ण पद्धतीने कसा साजरा करू शकतो?

A8. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजून घेऊन आणि उत्सवात सक्रिय सहभाग घेऊन आपण प्रजासत्ताक दिन अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करू शकतो. आपण भारतीय राज्यघटना आणि त्यात समाविष्ट असलेल्या अधिकार आणि कर्तव्यांबद्दल स्वतःला शिक्षित करू शकतो. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विविधतेत एकता या मूल्यांचे पालन करण्याची शपथही आपण घेऊ शकतो. आपण सामुदायिक सेवा उपक्रमात सहभागी होऊ शकतो आणि राष्ट्र उभारणीत योगदान देऊ शकतो.

शेवटी, प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे कारण तो दिवस आपल्या संविधानाचा स्वीकार करतो आणि लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात करतो. हा एक दिवस आहे जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी आणि नेत्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करतो आणि आपल्या राज्यघटनेच्या मूल्यांचे पालन करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करतो. प्रजासत्ताक दिन आपण सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या दिशेने अभिमानाने आणि समर्पणाने साजरा करूया.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • My favorite festival is Diwali | Maza Avadta San Diwali Nibandh Marathi | माझा आवडता सण दिवाळी.
  • India in my Dream Essay | Mazya Swapnatil Bharat Nibandh | माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी
  • My favorite festival is Eid | Maza Avadta San eid | माझा आवडता सण ईद .
  • My favorite festival is Christmas | Christmas NIbandh Marathi | माझा आवडता सण ख्रिसमस.
  • Makar Sankranti Marathi Essay | Makar Sankranti Marathi Nibandh | मकर संक्रांति मराठी निबंध.
  • Maza Desh Bharat Essay | Maza Desh Bharat Nibandh | माझा देश भारत मराठी निबंध

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

(२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | Republic Day Speech in Marathi

(२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन भाषण मराठी |  republic day speech in marathi.

सर्वांना सुप्रभात. आज आपण भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आणि आपल्या राज्यघटनेच्या पाया आणि आदर्शांना पुन्हा समर्पित करण्याचा हा दिवस आहे.

कायद्याचे राज्य: संविधानाने कायद्याचे राज्य स्थापित केले आहे, याचा अर्थ कायद्यासमोर प्रत्येकजण समान आहे.

मूलभूत हक्क: संविधानाने सर्व नागरिकांना काही मूलभूत अधिकारांची हमी दिली आहे.

गेल्या 74 वर्षात भारताने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. आम्ही जगातील एक आघाडीची अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि आम्ही दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. तथापि, अजूनही अनेक आव्हाने आहेत ज्यांचा सामना करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, दारिद्र्य, असमानता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी आपल्याला अधिक काही करण्याची गरज आहे. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या सर्व नागरिकांना दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळतील याची खात्री करण्यासाठी आपण आणखी काही करणे आवश्यक आहे.

या प्रजासत्ताक दिनी, एक उत्तम भारत घडवण्यासाठी एकत्र काम करण्याची प्रतिज्ञा करूया. आपल्या राज्यघटनेच्या तत्त्वांशी आणि न्याय, समता आणि बंधुत्वाच्या आदर्शांना आपण पुन्हा झोकून देऊ या.

एक चांगला भारत घडवण्यासाठी आपण करू शकतो अशा काही गोष्टी येथे आहेत:

संविधानाचा आणि सर्व नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा आदर करा.

कायद्याचे राज्य कायम ठेवा आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी काम करा.

सर्वांसाठी शिक्षण आणि आरोग्य सेवेचा प्रचार करा.

आपल्या पर्यावरणाचे रक्षण करा आणि शाश्वत विकास सुनिश्चित करा.

गरिबी, असमानता आणि भेदभाव विरुद्ध लढा.

जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवणे.

भारताला लोकशाही आणि मानवी हक्कांचे ज्वलंत उदाहरण बनवण्यासाठी आपण सर्व मिळून काम करूया. 

जय हिंद!

२६ जानेवारीच्या भाषणासाठी अतिरिक्त नोट्स:

तुम्ही तुमचे भाषण विशिष्ट श्रोत्यांसाठी किंवा विशिष्ट विषयासाठी तयार करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही विद्यार्थ्यांना भाषण देत असाल, तर तुम्ही शिक्षणाचे महत्त्व आणि उत्तम भारत घडवण्यासाठी तरुणांच्या भूमिकेबद्दल बोलू शकता. जर तुम्ही व्यावसायिक श्रोत्यांना भाषण देत असाल, तर तुम्ही आर्थिक वाढीचे महत्त्व आणि सामाजिक विकासात खाजगी क्षेत्राची भूमिका याबद्दल बोलू शकता.

तुम्ही तुमचे भाषण भारत सरकारच्या विशिष्ट कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी किंवा भारतासमोरील विशिष्ट आव्हानांवर चर्चा करण्यासाठी देखील वापरू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही शिक्षण आणि आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या अलीकडील उपक्रमांबद्दल किंवा गरिबी आणि असमानतेच्या आव्हानांबद्दल बोलू शकता.

आपल्या भाषणाचा शेवट कॉल टू अॅक्शनने करण्याचे सुनिश्चित करा. तुमच्या प्रेक्षकांना एक चांगला भारत घडवण्यासाठी ते काय करू शकतात याचा विचार करण्यास प्रोत्साहित करा. उदाहरणार्थ, तुम्ही त्यांना त्यांचा वेळ एखाद्या सामाजिक कारणासाठी, धर्मादाय संस्थेला देणगी देण्यासाठी किंवा ते भेटणाऱ्या प्रत्येकाशी दयाळू आणि आदराने वागण्यास सांगू शकता.

भाषण 2

स्त्रिया आणि सज्जनांनो, आज, आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग साजरा करण्यासाठी, २६ जानेवारी या शुभ दिवशी आपण येथे जमलो आहोत. हा एक दिवस आहे जो आपल्या हृदयात अभिमानाने भरतो, एक दिवस जेव्हा आपण आपल्या संविधानाचा स्वीकार करतो आणि भारतीय प्रजासत्ताकच्या जन्माचे स्मरण करतो.

1950 मध्ये या दिवशी, आपले दूरदर्शी नेते आणि संविधानाचे रचनाकार, ज्यांचे नेतृत्व डॉ. बी.आर. आंबेडकरांनी आम्हाला सर्वात मौल्यवान भेट दिली - एक अब्ज भारतीयांच्या आशा, स्वप्ने आणि आकांक्षांना मूर्त स्वरूप देणारे संविधान. हे संविधान न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांचा दाखला आहे, जे आपल्या महान राष्ट्राचा पाया आहे.

आज आपण याठिकाणी उभे आहोत, तेव्हा या दिवसाचे महत्त्व लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. २६ जानेवारी ही केवळ कॅलेंडरवरील तारीख नाही; लोकशाही आणि कायद्याच्या राज्याप्रती असलेल्या आपल्या बांधिलकीचे ते प्रतीक आहे. हे विविधतेतील एकतेच्या विजयाचे प्रतिनिधित्व करते, कारण याने विविध प्रदेश, भाषा, धर्म आणि पार्श्वभूमीतील लोकांना एका ध्वजाखाली आणि एका संविधानाखाली एकत्र आणले.

आपली राज्यघटना केवळ कायदेशीर कागदपत्र नाही; हा एक मार्गदर्शक प्रकाश आहे ज्याने आपल्या देशाला अशांत काळात चालवले आहे आणि आपल्याला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उदयास येण्यास मदत केली आहे. संवाद आणि चर्चेद्वारे आमचे मतभेद दूर करण्यासाठी, प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचे आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आणि राज्यकारभाराची शक्ती लोकांकडे आहे याची खात्री करण्यासाठी आम्हाला फ्रेमवर्क प्रदान केले आहे.

या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि या लोकशाही प्रजासत्ताकाच्या उभारणीसाठी अथक परिश्रम करणाऱ्या असंख्य व्यक्तींनी केलेल्या बलिदानाचे स्मरण केले पाहिजे. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्याच्या अहिंसक लढ्यापासून ते संविधान सभेतील आपल्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या अथक परिश्रमांपर्यंत, स्वतंत्र आणि लोकशाही भारताच्या कार्यासाठी त्यांच्या समर्पणाने आपल्या देशाच्या यशाचा पाया घातला.

आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, आपल्यासमोरील आव्हाने विसरू नये. आपण आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेली मूल्ये - न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व बळकट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या समाजातून भेदभाव, गरिबी आणि विषमता दूर करण्यासाठी आपण काम केले पाहिजे. आपण आपल्या पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे आणि भावी पिढ्यांसाठी आपला सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

आपल्या देशाची अथक सेवा करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे - आपल्या सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि स्त्रिया, समर्पित नागरी सेवक, आरोग्यसेवा कर्मचारी, शिक्षक आणि आपल्या प्रगतीसाठी आणि चांगले योगदान देणारे असंख्य इतर- अस्तित्व.

शेवटी, आपण आपल्या संविधानाचा आत्मा जपू या, एक दस्तऐवज जो आपल्याला आपल्या विविधतेत एकत्र आणतो आणि उज्ज्वल भविष्याकडे मार्गदर्शन करतो. भारत हे लोकशाहीचे आणि जगासाठी प्रगतीचे एक ज्वलंत उदाहरण राहील याची खात्री करून त्याची तत्त्वे आणि मूल्ये टिकवून ठेवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करूया.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

भाषण 3

स्त्रिया आणि सज्जनांनो, आज, प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण येथे जमलो असताना, आपल्या महान राष्ट्राचे सार - "विविधतेत एकता" ची खऱ्या अर्थाने व्याख्या करणार्‍या एका अनोख्या दृष्टीकोनाचा शोध घेऊया.

भारत हा केवळ एक देश नाही; हे संस्कृती, भाषा, परंपरा आणि श्रद्धा यांचा कॅलिडोस्कोप आहे. आम्ही एक अशी भूमी आहोत जिथे प्रत्येक कोपरा एक वेगळी कथा सांगतो, प्रत्येक राज्य आपल्या अद्वितीय पाककृतीचा अभिमान बाळगतो आणि प्रत्येक सण त्याचे विशिष्ट आकर्षण आणतो. ही विविधता आव्हानात्मक नाही; ती आमची ताकद आहे. आपले राष्ट्र हे अगणित रंगांच्या धाग्यांनी विणलेल्या सुंदर टेपेस्ट्रीसारखे आहे, प्रत्येक धागा फॅब्रिकच्या एकूण सौंदर्यात आणि समृद्धतेला हातभार लावतो.

याचा विचार करा - आमच्याकडे अधिकृतपणे मान्यताप्राप्त 22 भाषा आहेत आणि आमच्या देशाच्या लांबी आणि रुंदीमध्ये हजारो अधिक बोलल्या जातात. आपण अनेक सण-उत्सव साजरे करतो, त्यातील प्रत्येक त्याच्या विधी आणि परंपरांसह. आमची पाककृती प्रत्येक राज्यानुसार बदलते, जे चवी आणि चवींची आनंददायी श्रेणी देतात. तरीही, हे मतभेद असूनही, आपण सर्व एकतेच्या धाग्याने बांधलेले आहोत.

1950 मध्ये या दिवशी स्वीकारण्यात आलेली आपली राज्यघटना ही एकता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे आपल्या राष्ट्राच्या विविधतेला ओळखते आणि त्याचा आदर करते आणि एक समान फ्रेमवर्क प्रदान करते जे आपल्याला एक लोक म्हणून एकत्र करते. कोणत्याही धर्माचे पालन करण्याचा अधिकार, कोणतीही भाषा बोलण्याचा अधिकार आणि कोणत्याही संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार याची हमी देते. ती आपली विविधता साजरी करते, ती आपल्या राष्ट्रीय ओळखीचा अविभाज्य भाग बनवते.

विविधतेतील एकता म्हणजे केवळ एक कॅचफ्रेज नाही; तो जीवनाचा एक मार्ग आहे. आपल्या राष्ट्राचा इतिहास हा या एकतेचा पुरावा आहे. प्राचीन सिंधू संस्कृतीपासून मौर्य साम्राज्य, मुघल राजवंश आणि ब्रिटीश राजापर्यंत, आम्ही अनेक राज्यकर्ते सहन केले आहेत, प्रत्येकाने आपल्या भूमीवर आपली छाप सोडली आहे. तरीही या सगळ्यातून आपण एकसंध राहिलो.

हे ऐक्य केवळ प्रतीकात्मक नाही; हे आपल्या सामूहिक चेतनेमध्ये खोलवर रुजलेले आहे. जेव्हा राष्ट्रासमोर आव्हाने येतात, तेव्हा आपण एकत्र येतो. नैसर्गिक आपत्ती असो, आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो किंवा कोणत्याही प्रकारचे संकट असो, आम्ही खांद्याला खांदा लावून उभे असतो, आमच्या सर्व मतभेदांच्या पलीकडे.

आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, आपण या दिवसाचे केवळ ऐतिहासिक महत्त्वच लक्षात ठेवू नये तर आपल्याला भारतीय म्हणून परिभाषित करणार्‍या विविधतेच्या विलक्षण टेपेस्ट्रीचा विचार करूया. आपण आपले मतभेद स्वीकारू या, एकमेकांकडून शिकूया आणि समजुतीचे पूल बांधू या. विविधतेतील आपली एकता ही दुर्बलता नसून आपली सर्वात मोठी ताकद आहे हे आपण ओळखू या.

शेवटी, आपण आपल्या राज्यघटनेतील मूल्ये जपण्याची आणि विविधतेतील एकतेची भावना जपण्याची शपथ घेऊ या. या महान राष्ट्राचे अभिमानी नागरिक म्हणून एकजुटीने उभे राहून आपण आपले मतभेद साजरे करूया. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

 भाषण 4

स्त्रिया आणि सज्जनांनो, आज, प्रजासत्ताक दिनानिमित्त, आपण आपल्या महान राष्ट्राचा एक अनोखा आणि प्रेरणादायी पैलू शोधूया—भारताचे भविष्य घडवणारी आपल्या तरुणांची शक्ती.

भारत हे तरुण विचारांचे राष्ट्र आहे, असा देश जिथे निम्म्याहून अधिक लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे. हा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश केवळ आकडेवारी नाही; ही एक प्रचंड संपत्ती आहे जी आपल्या राष्ट्राला अभूतपूर्व उंचीवर नेऊ शकते. आपले तरुण हे केवळ भारताचे भविष्य नाही; ते त्याच्या वर्तमानामागील प्रेरक शक्ती आणि त्याच्या नशिबाचे शिल्पकार आहेत.

आमची तरुण पिढी आमच्या राज्यघटनेच्या आदर्शांना मूर्त रूप देते - ते आशा, समानता आणि न्यायासाठी वचनबद्धतेचे किरण आहेत. ते नाविन्यपूर्ण, निर्भय आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या इच्छेने प्रेरित आहेत. ते आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे मशाल वाहक आहेत आणि आधुनिक जगालाही मोकळ्या हातांनी सामावून घेत आहेत. परंपरा आणि प्रगती यांच्या या गतिमान मिश्रणातच आपल्या तरुणाईचे वेगळेपण आहे.

आम्ही तरुण भारतीयांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेपासून कला, क्रीडा आणि सामाजिक सक्रियतेपर्यंत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना पाहिले आहे. ते अडथळे तोडत आहेत, स्टिरियोटाइप तोडत आहेत आणि हे सिद्ध करत आहेत की फरक करण्यासाठी वय ही मर्यादा नाही. जग आपल्या तरुण मनांकडे कौतुकाने पाहते, कारण त्यांच्यात केवळ आपल्या राष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आकार देण्याची क्षमता आहे.

आजचे तरुण डिजिटल नेटिव्ह आहेत आणि त्यांना कनेक्टिव्हिटी आणि माहितीची ताकद समजते. त्यांच्याकडे परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी, हवामान बदल, सामाजिक असमानता आणि दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता यासारख्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्यासाठी साधने आणि ज्ञान आहे. ते त्यांचे मन बोलण्यास, यथास्थितीवर प्रश्न विचारण्यास आणि चांगल्या भविष्याची मागणी करण्यास घाबरत नाहीत.

अलीकडील वर्षांनी आम्हाला दाखवून दिले आहे की जेव्हा आमचे तरुण एकत्र येतात तेव्हा ते धोरणांवर प्रभाव टाकू शकतात, सामाजिक जागरूकता आणू शकतात आणि बदल घडवून आणू शकतात. लैंगिक समानता असो, पर्यावरण संवर्धन असो किंवा सामाजिक न्याय असो, ते ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतात त्यासाठी उभे राहण्याचे धैर्य त्यांच्यात आहे.

आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, आपल्या तरुणांमधील अफाट क्षमता ओळखू या. आपण त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी, त्यांच्या आवडींचा पाठपुरावा करण्यासाठी आणि आपल्या राष्ट्राचे भवितव्य घडवण्यात सक्रिय भूमिका घेण्यास प्रोत्साहित करूया. त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि पाठबळ देऊ या.

शेवटी, आपल्या तरुणांची शक्ती ही एक अद्वितीय आणि अमूल्य संपत्ती आहे जी भारताला जागतिक स्तरावर वेगळे करते. त्यांचा आत्मा, त्यांची सर्जनशीलता आणि एक उत्तम भारत घडवण्याची त्यांची अटल वचनबद्धता साजरी करूया. एकत्रितपणे, आपल्या तरुणांच्या उर्जेने आणि दूरदृष्टीने, आपण आपल्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेली स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करू शकतो. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

 भाषण 5

निश्चितपणे, "भारताच्या लोकशाहीची लवचिकता" या थीमवर लक्ष केंद्रित करून प्रजासत्ताक दिनाच्या भाषणासाठी येथे एक अद्वितीय दृष्टीकोन आहे:

स्त्रिया आणि सज्जनांनो, या प्रजासत्ताक दिनी, आपण आपल्या देशाच्या प्रवासातील एका अनोख्या पैलूवर - भारताच्या लोकशाहीची उल्लेखनीय लवचिकता यावर विचार करूया.

आपली लोकशाही ही केवळ शासन व्यवस्था नाही; ही एक जिवंत, श्वास घेणारी संस्था आहे जी टिकून राहिली आहे आणि शक्यतांच्या विरोधात भरभराट झाली आहे. भारताची लोकशाही केवळ आकार आणि विविधतेसाठीच नव्हे तर इतिहासातील वादळांना तोंड देण्याच्या आणि प्रत्येक आव्हानाला सामर्थ्यवान बनवण्याच्या क्षमतेसाठी जगात अद्वितीय आहे.

26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना लागू झाल्यापासून आपण अंतर्गत आणि बाह्य अशा अनेक परीक्षांचा सामना केला आहे. आर्थिक आव्हाने, राजकीय उलथापालथ, सामाजिक परिवर्तने आणि सुरक्षेच्या प्रश्नांनी आपल्या लोकशाहीच्या जडणघडणीची चाचणी घेतली आहे. तरीही, तो स्थिर राहिला आहे, जगासाठी आशेचा किरण म्हणून उंच उभा आहे.

आपल्या लोकशाहीचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे सत्तेचे शांततापूर्ण संक्रमण. दर पाच वर्षांनी कोट्यवधी नागरिक मतदानाचा हक्क बजावतात आणि लोकांच्या इच्छेचा विजय होतो. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांद्वारे आपले नेते निवडण्याची ही प्रक्रिया हलक्यात घेतली जाऊ नये; हे आमच्या सामूहिक शहाणपणाचा आणि लोकशाही मूल्यांप्रती वचनबद्धतेचा दाखला आहे.

भारताच्या लोकशाहीला वेगळे करणारा आणखी एक पैलू म्हणजे तिची सर्वसमावेशकता. भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक अशा सर्व प्रकारांतील विविधता आपण स्वीकारली आहे. आपली लोकशाही कोणत्याही पार्श्वभूमीची पर्वा न करता सर्व आवाज ऐकण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. ही सर्वसमावेशकता आपल्या लोकांमध्ये एकतेची भावना वाढवते, जरी आपण आपले मतभेद साजरे करतो.

आपल्या लोकशाहीनेही विलक्षण अनुकूलता दाखवली आहे. आपल्या समाजाच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते विकसित झाले आहे. आवश्यकतेनुसार आम्ही आमच्या संविधानात सुधारणा केल्या आहेत, आमच्या लोकशाही संस्थांचा विस्तार केला आहे आणि उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणे स्वीकारली आहेत. परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि सुधारण्याची ही क्षमता आपल्या लोकशाहीच्या लवचिकतेचा पुरावा आहे.

अनेक अडथळे आणि टीका होऊनही भारताच्या लोकशाहीने आपली योग्यता सिद्ध केली आहे. यामुळे सामाजिक न्याय, आर्थिक प्रगती आणि वैयक्तिक स्वातंत्र्य सुलभ झाले आहे. त्यातून केवळ आपल्या राष्ट्रालाच नव्हे तर जगालाही प्रेरणा देणारे नेते जन्माला आले आहेत. याने उपेक्षितांना सशक्त केले आहे, असुरक्षित लोकांच्या हक्कांचे रक्षण केले आहे आणि महत्त्वाकांक्षी लोकांना संधी दिली आहे.

या प्रजासत्ताक दिनी, आपण भारताच्या लोकशाहीच्या अद्वितीय लवचिकतेचा उत्सव साजरा करूया. आपल्या राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचे पालन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करूया. आपल्या लोकशाहीची ताकद प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे, हेही आपण लक्षात ठेवूया. आपली लोकशाही ही केवळ देणगी नाही; ही एक जबाबदारी आहे जी आपण जपली पाहिजे आणि त्याचे संरक्षण केले पाहिजे.

शेवटी, भारताच्या लोकशाहीची लवचिकता हा अभिमान आणि प्रेरणा आहे. आव्हानांवर मात करण्याच्या आणि मजबूत बनण्याच्या आपल्या राष्ट्राच्या क्षमतेचा हा जिवंत पुरावा आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या लोकशाहीचे रक्षण आणि बळकटीकरण करण्याची शपथ घेऊ या. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!

  • Times Now Marathi
  • TN Navbharat
  • ET Now Swadesh

ट्रेंडिंग :

marathi news

Republic day 2024 Speech: प्रजासत्ताक दिनासाठी भाषण करायचंय, 'या' टिप्स वापरा होईल टाळ्यांचा कडकडाट

author-479263783

Updated Jan 23, 2024, 11:53 AM IST

75th Republic day 2024 (प्रजासत्ताक दिन)

75th Republic day 2024 (प्रजासत्ताक दिन)

अशी करा भाषणाची सुरुवात

Daily Horoscope 15 March आजचे राशीभविष्य 15 मार्च या राशीला रखडलेले पैसे मिळतील कौटुंबिक आनंद घ्याल

Daily Horoscope 15 March: आजचे राशीभविष्य, 15 मार्च, या राशीला रखडलेले पैसे मिळतील, कौटुंबिक आनंद घ्याल

Santoshi Mata Katha  आज शुक्रवार ! जीवनातील संकटं दूर करतं संतोषी मातेचे व्रत जाणून घ्या पूजाविधी आणि पौराणिक कथा

Santoshi Mata Katha : आज शुक्रवार ! जीवनातील संकटं दूर करतं संतोषी मातेचे व्रत, जाणून घ्या पूजाविधी आणि पौराणिक कथा

Petrol and Diesel Prices लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा सुखद दे धक्का! पेट्रोल डिझेलच्या किंमतीत 2 रुपयांची घट

Petrol and Diesel Prices: लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा सुखद दे धक्का!, पेट्रोल डिझेलच्या किंमतीत 2 रुपयांची घट

उन्हाळ्यात कपड्यांमुळे त्वचेला पुरळ रॅशेसची समस्या सतावते Fashion करण्यापूर्वी लक्षात घ्या या गोष्टी

उन्हाळ्यात कपड्यांमुळे त्वचेला पुरळ, रॅशेसची समस्या सतावते? Fashion करण्यापूर्वी लक्षात घ्या 'या' गोष्टी

Mamata Banerjee Accident  पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee Accident : पश्चिम बंगालच्या CM ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

रेल्वे तिकिटांचा जाच सुटणार; AI टूल करणार तिकीट बुकिंग; AskDisha ला विचारा प्रोसेस

रेल्वे तिकिटांचा जाच सुटणार; AI टूल करणार तिकीट बुकिंग; AskDisha ला विचारा प्रोसेस?

Loksabha Election 2024  लोकसभेसाठी भाजपच्या नेत्यांनी घेतलाय धसका तिघांनी सोडलाय सुटकेचा निश्वास; वाचा कोण आहेत हे दिग्गज

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी भाजपच्या नेत्यांनी घेतलाय धसका, तिघांनी सोडलाय सुटकेचा निश्वास; वाचा कोण आहेत हे दिग्गज

Summer Skin Tips उन्हाळ्यात वापरण्यासाठी नॅचरल फेस क्निझर कोणते तुमच्या स्वयंपाकघरात नक्कीच असतील

Summer Skin Tips: उन्हाळ्यात वापरण्यासाठी नॅचरल फेस क्निझर कोणते? तुमच्या स्वयंपाकघरात नक्कीच असतील

होळीला बिहारसाठी धावणार या 7 SPECIAL ट्रेन्स UP च्या या शहरांना होणार फायदा

​होळीला बिहारसाठी धावणार या 7 SPECIAL ट्रेन्स, UP च्या या शहरांना होणार फायदा​

विदेशातील या सर्वात फेव्हरेट ठिकाणी रणबीरने आलिया भट्टला केले होते प्रपोज

विदेशातील या सर्वात फेव्हरेट ठिकाणी रणबीरने आलिया भट्टला केले होते प्रपोज

आजचे राशीभविष्य 15 मार्च  या राशीला रखडलेले पैसे मिळतील वाचा

​आजचे राशीभविष्य 15 मार्च : या राशीला रखडलेले पैसे मिळतील, वाचा

Daily Horoscope 15 March आजचे राशीभविष्य 15 मार्च या राशीला रखडलेले पैसे मिळतील कौटुंबिक आनंद घ्याल

  • Times Now Marathi
  • Follow us on :

Times Network Marathi News

  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र देशा
  • वेब स्टोरीज
  • चंदेरी दुनिया
  • लाइव्ह टीव्ही
  • महाराष्ट्र ते जग
  • Marathi News >
  • Republic Day Speech Bhashan nibhandh PDF in Marathi

Republic Day Speech in Marathi: 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचे मराठीतून भाषण आणि निबंध

टाइम्स नाऊ मराठी

Republic Day Speech in Marathi 2023: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले. त्या दिवसांपासून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो.

Republic Day Speech Bhashan nibhandh PDF in Marathi

  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले.
  • 2023 या वर्षी भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाईल.
  • 26 जानेवारी हा दिवस साजरा करतो ज्या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली.

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन निबंध मराठी – Republic Day Essay in Marathi

भाषणाची सुरूवात कशी करावी 

भारताच्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनों  आणि गुरूजन यांचे मी स्वागत करतो आणि माझ्या भाषणाला सुरूवात करतो. 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले. त्या दिवसांपासून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येतो.  प्रजासत्ताक दिन हा भारताच्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे, म्हणूनच हा दिन प्रत्येक जात आणि संप्रदाय मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा करतात.

2023 या वर्षी भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाईल. भारत दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आणि लोकशाहीचा स्वीकार केला, तो दिवस म्हणजे 26 जानेवारी. दुसर्‍या शब्दांत, 26 जानेवारी हा दिवस साजरा करतो ज्या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली.

अधिक वाचा :  वयाची साठी आली तरी नीता अंबानी दिसतात तिशीच्याच; पाहा सिक्रेट डाएट प्लॅन   प्रजासत्ताक दिन का साजरा करावा याची महत्त्व पटवून देणारा पॅरिग्राफ 

प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी भारतात प्रजासत्ताक आणि राज्यघटना अंमलात आली. याशिवाय या दिवसाचा आणखी एक इतिहास आहे, जो खूपच मनोरंजक आहे. डिसेंबर 1929 मध्ये लाहोरमध्ये पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनापासून त्याची सुरुवात झाली. ज्यामध्ये काँग्रेसने जाहीर केले होते की जर भारताला 26 जानेवारी 1930 पर्यंत स्वायत्त सरकार (डोमिनियन स्टेटस) दिले नाही, तर त्यानंतर भारत स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र घोषित करेल, परंतु जेव्हा हा दिवस आला आणि ब्रिटिश सरकारकडून या प्रश्नावर कोणतेही उत्तर दिले गेले नाही, तेव्हा त्या दिवसापासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याच्या ध्येयाने काँग्रेसने सक्रिय चळवळ सुरू केली. यामुळेच आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा 26 जानेवारी या दिवशी संविधान स्थापनेसाठी निवडण्यात आली.

अधिक वाचा :  भारतातील या ठिकाणी मुलं झाल्यानंतर होतात लग्न   भारतीय प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सण का आहे हे सांगणारा पॅरिग्राफ 

प्रजासत्ताक दिन हा काही सामान्य दिवस नसून, तो दिवस आहे जेव्हा आपल्या भारत देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले कारण भारत जरी 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला, पण 26 जानेवारी 1950 रोजी तो पूर्णपणे स्वतंत्र झाला. 'भारत सरकार कायदा' काढून भारत लागू करण्यात आला. त्यामुळे त्या दिवसापासून 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला. हा भारताच्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे, बाकीचे दोन म्हणजे गांधी जयंती आणि स्वातंत्र्य दिन. हा दिवस देशभरात राष्ट्रीय सुट्टी आहे, म्हणूनच शाळा आणि कार्यालयांसारख्या अनेक ठिकाणी कार्यक्रम एक दिवस आधी देखील साजरा केला जातो.

26 जानेवारी 1930 रोजी या दिवशी प्रथमच पूर्ण स्वराज कार्यक्रम साजरा करण्यात आला. ज्यामध्ये ब्रिटीश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली होती.

प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान एक ख्रिश्चन ध्वनी वाजविला ​​जातो, ज्याला महात्मा गांधींच्या आवडत्या ध्वनींपैकी एक असल्यामुळे "अ‍ॅबॉइड विथ मी" असे नाव देण्यात आले आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो हे भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. 1955 मध्ये राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात भारताच्या राष्ट्रपतींना 31 तोफांची सलामी दिली जाते.

अधिक वाचा :    लवकरच तुमचे Pan card होणार बंद !, Aadhar शी लिंक करण्याची सरकारची डेडलाईन

प्रजासत्ताक दिनाचा उत्सव

दरवर्षी 26 जानेवारीला हा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम नवी दिल्लीतील राजपथ येथे मोठ्या थाटात साजरा केला जातो. यासोबतच प्रजासत्ताक दिनी खास परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करण्याचीही प्रथा आहे, काही वेळा त्याअंतर्गत एकापेक्षा जास्त पाहुण्यांनाही आमंत्रित केले जाते. या दिवशी, भारताचे राष्ट्रपती प्रथम तिरंगा फडकावतात आणि त्यानंतर तेथे उपस्थित असलेले सर्व लोक एकत्रितपणे उभे राहून राष्ट्रगीत गातात.   यानंतर, विविध सांस्कृतिक आणि पारंपारिक झाकी काढण्यात येते, जे पाहण्यास अतिशय आकर्षक आहेत. यासोबतच या दिवसाचा सर्वात खास कार्यक्रम म्हणजे परेड, ज्याला पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. राजपथावरील (कर्तव्य पथावर)  परेडला सुरुवात होते. यात भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या विविध रेजिमेंटचा सहभाग आहे. तसेच विविध राज्यांचे चित्ररथ सामील होतात.    हा असा कार्यक्रम आहे ज्याद्वारे भारत देखील आपली सामरिक आणि मुत्सद्दी शक्ती प्रदर्शित करतो आणि जगाला संदेश देतो की आपण स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा हा कार्यक्रम भारताच्या परराष्ट्र धोरणासाठीही खूप महत्त्वाचा आहे कारण या कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या विविध देशांच्या प्रमुख पाहुण्यांच्या आगमनामुळे भारताला या देशांशी संबंध वाढवण्याची संधी मिळते.

अधिक वाचा :  मुलांच्या मनातील भीती कशी काढायची?   भाषणाचा शेवट 

प्रजासत्ताक दिन हा आपल्या देशाच्या तीन राष्ट्रीय सणांपैकी एक आहे, हा दिवस आपल्याला आपल्या प्रजासत्ताकाचे महत्त्व पटवून देतो. त्यामुळेच हा सण देशभरात मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. यासोबतच हा तो दिवस आहे जेव्हा भारत आपली सामरिक सामर्थ्य दाखवतो, जो कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, तर आपण स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम आहोत असा संदेश देण्यासाठी आहे. 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशासाठी एक ऐतिहासिक सण आहे, त्यामुळे आपण हा सण पूर्ण उत्साहाने आणि आदराने साजरा केला पाहिजे.

अधिक वाचा : 

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण 100 शब्दांत – Republic Day Essay in Marathi 100 Words

आपल्या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. त्यांच्या अत्याचाराला कंटाळून भारतीय नेत्यांनी, क्रांतीवीरांनी अनेक लढे देऊन आपल्या प्राणांची बाजी लावून भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र केले. तरीही  २६ जानेवारी १९५०  रोजी आपण सार्वभौम झालो. म्हणून प्रत्येक वर्षी २६ जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतभर थाटाने साजरा केला जातो.

२६ जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. सैनिकांचे संचलन, कवायती आणि संपूर्ण भारताचे दर्शन देणारे सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. त्या दिवशी एकमेकांना शुभेच्छाही देतात.

शहरातील सर्व कार्यालये, शाळा, महाविद्यालये येथेही ध्वजारोहणाचे कार्यक्रम होतात. नेत्यांची भाषणे होतात. वंदेमातरम, राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीतेही गाईली जातात. लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीटे देतात. त्या दिवशी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात.

अधिक वाचा :  आचार्य चाणक्य यांच्या मते, या लोकांपासून वाईट काळ पळतो दूर

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण 350 शब्द – Republic Day Essay in Marathi 350 Words

भारतात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण व उत्सव साजरे केले जातात. पण काही सण असे असतात की ज्यांचा संबंध राष्ट्र आणि त्यातील निवासी यांच्याशी असतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० पासून भारताने आपली नवी घटना लागू केली. स्वत:चे स्वतंत्र सरकार, राष्ट्रपती, ध्वज यांची निर्मिती झाली. भारत जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक बनले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपाविण्यात आली.

या दिवशी सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. सकाळी ७ वाजता राष्ट्रपती विजय चौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतींचे स्वागत करतात. तिरंगी झेंडा फडकविल्यानंतर तिन्ही सेनेच्या तुकड्या सलामी मंचाकडे जातात. बँडवर सैनिक राष्ट्रीय संगीत वाजवितात. घोडे व उंटावर स्वार झालेल्या सैनिकांच्या तुकड्या येतात. भारतात तयार करण्यात आलेले रणगाडे, तोफा, रॉकेट आदींचे प्रदर्शन केले जाते. भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. शालेय विद्यार्थी त हेत-हेची नृत्ये, व्यायाम, आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. विविधतेत एकता दाखविणारे देखावे निघतात. या देखाव्यांत त्या त्या राज्यांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक झलक असते. शौर्य गाजविणाऱ्या मुला-मुलींचा सन्मान केला जातो. साडेअकरा वाजता लाल किल्ल्यावर परेडचे विसर्जन होते. आकाशातून विमाने पुष्पवृष्टी करतात.

सर्व राज्यांत प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा केला जातो. त्याठिकाणी राज्यपाल सलामी घेतात आणि प्रादेशिक वेशभूषेत नृत्यगायन होते. शाळेतील मुलेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. सरकारी कार्यालयांवर रोषणाई केली जाते. राष्ट्रपती भवन, संसद, सचिवालय विजेच्या रोषणाईत न्हाऊन निघतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते. राष्ट्रपती रात्री देशी-विदेशी अतिथींना मेजवानी देतात. या दिवशी शासकीय व अशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा होतात.

प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण विचार केला पाहिजे की आपण काय गमावले आणि काय मिळविले! आपण राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता, आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

  • Latest fashion lifestyle News

ham

Friday , 15 March 2024

मराठीचे तपशील

Republic Day 2024 Speech: प्रजासत्ताक दिनी भाषण करताय? या टिप्स फॉलो करा, सगळेच करतील कौतुक!

Republic day 2024 speech, essay in marathi: प्रजासत्ताक दिन काहीच दिवसांवर आला आहे. या दिवशी जर तुम्ही शाळा, महाविद्यालय किंवा तुमच्या सोसायटी अशा ठिकाणी भाषण देणार असाल तर तुम्ही भाषणाच्या तयारीसाठीच्या टिप्स आवर्जून जाणून घ्या..

74th Republic Day speech, essay ideas and tips

26th January 2024: आपल्या देशात दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली, तेव्हापासून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरात भारतीय संविधान लागू होऊन यंदा ७४ वर्षे पूर्ण होत असून यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या दिवशी वेगवगेळे कार्यक्रम केले जातात. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सरकारी केंद्रे, ऑफिस तसेच सोसायट्या इत्यादींमध्ये हा दिवस वेगवगेळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येक वयोगटातील लोक यात उत्साहाने सहभागी होतात. यानिमित्ताने भाषणही केले जाते. जर तुम्हालाही प्रजासत्ताक दिनानिमित्त अधिक चांगले भाषण तयार करायचे असेल, तर हा आम्ही तुमची मदत करणार आहोत. भाषणाची तयारी करताना कोणत्या टिप्स फॉलो करणे गरजेचे आहे याबद्दल जाणून घेऊयात.

अशा प्रकारे करा भाषणाची सुरूवात

जर तुम्ही भाषणाची तयारी करत असाल तर प्रथम सर्वांना शुभेच्छा द्या. जर तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये भाषण देत असाल तर भाषणाच्या सुरुवातीला उपस्थित पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्या.

Republic Day 2024: या प्रजासत्ताक दिनी, मुलांना २६ जानेवारीचे महत्त्व या प्रकारे शिकवा!

इतिहास सांगा.

सगळ्यांना अभिवादन केल्यानंतर, सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनावर प्रकाश टाका. यंदा आपण कोणता प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत ते सांगा. यानंतर प्रजासत्ताक दिनाचा इतिहास सांगा. हा दिवस कसा तयार झाला, कोणी तयार केला आणि किती दिवसांत पूर्ण झाला यासारखी माहिती द्या. यासोबतच संविधान सभा, तिचे सदस्य आणि संविधानाचा संदर्भ घेऊन कोणत्या देशांची राज्यघटना तयार करण्यात आली याची माहिती देऊ शकता.

कविता आणि शायरी वापरा

भाषणादरम्यान तुम्ही त्या काळासाठी योग्य वाटणाऱ्या कविता आणि शायरी आवर्जून ऍड करा. यामुळे तुमच्या बोलण्यात रस वाढेल आणि लोक तुमचं भाषणं अत्यंत लक्षपूर्वक ऐकतील.

Republic Day 2024: लहान मुले असो मोठे, प्रत्येकाने दिल्लीतील आवर्जून बघावी ही ऐतिहासिक ठिकाणे!

सर्वांचे आभार माना.

भाषणाच्या शेवटी, सर्व पाहुणे, शिक्षक आणि उपस्थित सर्वांचे आभार माना. शेवटी, आभार व्यक्त करताना कविता किंवा चारोळी बोला. यामुळे भाषणाचा शेवट आणखीन छान होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

प्रजासत्ताक दिन निबंध मराठी | Republic day essay in marathi

Republic day essay in marathi : आपल्या देशात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. वर्ष 1950 मध्ये याच दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला होता. म्हणजेच देशाची सत्ता इंग्रजांच्या हातून भारतीयांच्या हातात आली होती. आजच्या या लेखात आपण Prajasattak din Nibandh  मिळवणार आहोत. हा  प्रजासत्ताक दिन  मराठी  निबंध आपण आपल्या शाळेत वापरू शकतात.

essay on republic day in marathi

1) प्रजासत्ताक दिन मराठी निबंध - Prajasattak din marathi nibandh

आपला देश भारत दीर्घकाळापर्यंत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता, भारतीय स्वतंत्र सैनिकांच्या अथक परिश्रमातून भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र मिळाले. व यांच्या जवळपास दीड वर्षानंतर भारताने आपली घटना लागू केली. यालाच भारताचे संविधान ही म्हटले जाते. यानंतर भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखले जावू लागले. जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांनंतर भारताचे संविधान तयार झाले. व 26 जानेवारी 1950 भारतीय संसद द्वारे या संविधानाला पास करण्यात आले. 

भारतात तसेच विदेशात राहत असलेल्या भारतीयांसाठी प्रजासत्ताक दिवस साजरा करणे सन्मानाची गोष्ट आहे. या उत्सवाची तयारी एक महिना आधीच सुरू होऊन जाते. यादरम्यान दिल्लीतील इंडिया गेट जवळ लोकांचे येणे जाणे बंद करण्यात येते.  यामुळे त्या दिवशी तेथे असलेल्या लोकांना सुरक्षा प्रदान होते. 

दिल्लीत होणाऱ्या या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान सामील होतात. या कार्यक्रमात भारताची विविधता प्रस्तुत केली जाते. यानंतर भारतीय सैनिकांची परेड, पुरस्कार वितरण इत्यादी गोष्टी घडतात. व कार्यक्रमाच्या शेवटी शांत वातावरणात राष्ट्रगीत म्हटले जाते.

प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी शासकीय तसेच खासगी दोन्ही क्षेत्रांना सुट्टी असतात. भारतीय लोक आपले घर, ऑफिस व गाड्यांना तिरंगी रंगाचे फुले व झेंडे लाऊन सजवतात. विविध शाळांमध्ये निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. शालेय विद्यार्थी एक महिना आधीच प्रजासत्ताक दिन भाषण तयार करून ठेवतात. 

या दिवशी विविध संस्था व शाळेकडून विद्यार्थ्यांना खेळ, शिक्षण व इतर क्षेत्रात चांगले प्रदर्शन केल्याबद्दल पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात येते. कुटुंबातील सदस्य या दिवशी आपले मित्र मंडळी सोबत सामाजिक स्थानांवर भेट देतात. सकाळी आठ वाजेला राजपथवर होत असलेला कार्यक्रम संपूर्ण देशात लाईव्ह दाखवला जातो.

  • प्रजासत्ताक दिनाचे भाषण  <<वाचा येथे
  • प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश  <<वाचा येथे

2) प्रजासत्ताक दिन निबंध मराठी - Republic day essay in Marathi

प्रजासत्ताक दिन भारताचा राष्ट्रीय उत्सव आहे. हा दिवस भारत प्रजासत्ताक झाल्याच्या आनंदात साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 ला भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. या दिवशी स्वतंत्र 

भारताची नवीन राज्य घटना लागू करण्यात आली. हा दिवस भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. भारतीय घटनेनुसार डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती होते. या निर्णयानंतर देशभरात आनंद साजरा केला गेला. व तेव्हापासून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 

26 जानेवारीचा हा दिवस भारतीयांसाठी गौरवाचा दिवस आहे. यादिवशी देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, कॉलेज, कार्यालय तसेच सर्वच प्रमुख स्थानांवर तिरंगा ध्वज फडकवला जातो. शालेय मुले या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतात. या दिवशी विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. लोकनृत्य, लोकगीत, राष्ट्रगीत इत्यादी सादर केले जातात. 

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम देशाची राजधानी दिल्ली येथे होतो. या दिवशी देशाच्या विजय चौक वर मंच स्थापन करण्यात येतो. या ठिकाणी देशाचे राष्ट्रपती येऊन तिरंगा फडकवतात. यांनतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात येते. भारतीय सेनेद्वारे आपली सैन्य शक्तीचे प्रदर्शन केले जाते. सैनिकांच्या परेड होतात. ही परेड पाहण्यासाठी राष्ट्रपती सोबत, नेता व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. बऱ्याचदा या दिवशी इतर देशांच्या पंतप्रधानांना अतिथी म्हणून बोलावण्यात येते. 

प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी देशाच्या महान स्वातंत्र्य सैनिकांना स्मरण केले जाते. हजारो व लाखो लोकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस इत्यादी अनेक महान नेत्यांनी आपले संपूर्ण जीवन लावले. यांनी भारतीयांसमोर एक आदर्श निर्माण केला. आपला देश या महान स्वतंत्र सैनिकामुळेच कश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत एक आहे.

तर मित्रांनो हा होता प्रजासत्ताक दिन मराठी निबंध तुम्हाला हा  prajasattak din marathi nibandh  कसा वाटला आम्हाला  कमेन्ट मध्ये नक्की कळवा. व या निबंधाचा योग्य उपयोग करून आपण आपला स्वतः चा Republic day essay in marathi देखील लिहू शकतात. धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

essay on republic day in marathi

प्रजासत्ताक दिन मराठी निबंध Republic Day Essay, Information In Marathi

Essay on republic day in marathi.

प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक विशेष दिवस आहे जेव्हा आपण भारतीय संविधान साजरे करतो. हा देश पाळत असलेल्या नियमांचा संच आहे आणि 26 जानेवारी 1950 रोजी त्याची सुरुवात झाली. हा एक दिवस आहे जेव्हा आपल्याला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व लोकांची आठवण होते. नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या लक्षात ठेवणे आणि आपल्या देशाच्या नियमांचे पालन करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देतो आणि आपण सर्व एक मोठे भारतीय कुटुंब म्हणून कसे एकत्र आहोत, जरी आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलो आहोत.

Republic Day

प्रजासत्ताक दिनाचा इतिहास

भारताचा प्रजासत्ताक दिन हा एक विशेष दिवस आहे जेव्हा आपल्याला भारताची राज्यघटना महत्त्वाची ठरलेली वेळ आठवते. 1947 मध्ये ब्रिटीश राजवटीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी हे घडले. देश कसा चालवावा यासाठी संविधान हे मार्गदर्शक पुस्तकासारखे आहे. डॉ.बी.आर. आंबेडकर आणि त्यांच्या टीमने राज्यघटना लिहिण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि शेवटी ती त्या दिवशी मान्य झाली. ही एक मोठी गोष्ट होती कारण याचा अर्थ असा होता की भारत राजा किंवा राणीच्या शासनापासून लोकशाहीत बदलला आहे, जेथे गोष्टी कशा केल्या जातात याबद्दल लोकांचे म्हणणे आहे. दरवर्षी, प्रजासत्ताक दिनी, आपण आपली पारंपारिक संस्कृती दाखवून आणि आपल्या देशासाठी महत्त्वाची लोकशाही, एकता आणि समानता या मूल्यांचे स्मरण करून साजरा करतो.

Essay On Republic Day In English

प्रजासत्ताक दिनाचे महत्व

प्रजासत्ताक दिन हा भारतातील विशेष दिवस आहे कारण तो लोकशाही आणि आपल्या देशातील महत्त्वाच्या नियमांचे प्रतिनिधित्व करतो. हे आपल्याला आठवण करून देते जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला आणि आपला देश बनला. प्रजासत्ताक दिनी, आम्ही लोकांची शक्ती, निष्पक्षता, समानता आणि स्वातंत्र्य साजरे करतो. आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर लोकांचाही विचार करतो आणि आपल्या देशाला न्याय देणार्‍या नियमांचा आदर करतो. नागरिक म्हणून आपले हक्क आणि जबाबदाऱ्या लक्षात ठेवण्याचा आणि आपला देश मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्याचा हा दिवस आहे.

भारतात प्रजासत्ताक दिन साजरा

भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीने साजरा केला जातो. मुख्य उत्सव राजधानी नवी दिल्ली येथे होतो, जिथे भारताचे राष्ट्रपती राजपथवर राष्ट्रध्वज फडकवतात. या कार्यक्रमात देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, लष्करी सामर्थ्य आणि तांत्रिक प्रगती दर्शविणारी भव्य परेड समाविष्ट आहे.

या परेडमध्ये रंगीबेरंगी फ्लोट्स, मार्चिंग तुकडी, विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारी झांकी आणि थरारक एअर शो यांचा समावेश आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी परेडमध्ये सहभागी होतात आणि विविध परफॉर्मन्सद्वारे त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करतात. याव्यतिरिक्त, संपूर्ण देशात ध्वजारोहण समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते आणि मिठाई वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. हा एकता आणि अभिमानाचा दिवस आहे, जेथे लोकशाहीच्या भावनेचे स्मरण करण्यासाठी नागरिक एकत्र येतात.

भारतातील ध्वजारोहण समारंभ

राजधानी नवी दिल्लीतील राजपथ येथे ध्वजारोहण समारंभ आयोजित केला जातो, जेथे भारताचे राष्ट्रपती राष्ट्रध्वज फडकवतात, त्यानंतर राष्ट्रगीत होते. या कार्यक्रमाला मान्यवर, परदेशी राजदूत आणि हजारो नागरिक उपस्थित असतात जे देशभक्तीचा देखावा पाहण्यासाठी जमतात.

ध्वजारोहण समारंभ हे केवळ राष्ट्रीय एकात्मतेचे आणि अभिमानाचे प्रतीक नाही, तर भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि तत्त्वांचे स्मरण म्हणूनही ते काम करते. हे लोकशाही, स्वातंत्र्य आणि समतेच्या भावनेचे द्योतक आहे ज्याचे भारत समर्थन करते. या समारंभात रंगीत परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होतो आणि राष्ट्राच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. सशस्त्र दल, पोलीस आणि इतर विविध संघटना परेडमध्ये सहभागी होऊन त्यांचे कौशल्य आणि देशभक्ती दाखवतात.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची परेड

दिल्ली प्रजासत्ताक दिन परेड भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठा कार्यक्रम आहे. हे संरक्षण मंत्रालयाने आयोजित केले आहे. परेड राष्ट्रपतींच्या घरापासून सुरू होते आणि राजपथ नावाच्या रस्त्यावरील इंडिया गेट नावाच्या प्रसिद्ध स्मारकाच्या मागे जाते. ही परेड भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि तीन दिवस चालते. परेड दरम्यान, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिकांचे विविध गट मार्चपास्ट करतात आणि त्यांचे गणवेश आणि पदके दाखवतात. भारताचे राष्ट्रपती, जे सैन्याचे प्रभारी आहेत, घड्याळ आणि सलामी देतात. परेडमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांचे इतर गटही भाग घेत आहेत.

भारताच्या संविधानाचा जन्म

प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक विशेष दिवस आहे जो त्यांच्या संविधानाची सुरुवात साजरा करतो. देश कसा चालवावा यासाठी संविधान हे नियमपुस्तकासारखे आहे. हे संविधान सभा नावाच्या लोकांच्या गटाने फार पूर्वी लिहिले होते. संविधान लिहिणाऱ्यांपैकी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर. भारताला एक चांगला देश होण्यास मदत करणारी महत्त्वाची तत्त्वे राज्यघटनेत समाविष्ट आहेत याची त्यांना खात्री करायची होती. प्रजासत्ताक दिनी, लोक संविधानाचे आणि ज्या लोकांनी ते बनवले त्यांचे महत्त्व लक्षात ठेवतात आणि साजरा करतात.

प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे, जो देशाच्या वसाहती राजवटीपासून सार्वभौम प्रजासत्ताक बनण्याच्या प्रवासाचे प्रतीक आहे. हा दिवस अभिमानाचा, देशभक्तीचा आणि एकतेचा आहे. भारताचे नागरिक या नात्याने, आपण प्रजासत्ताक दिन आनंदाने आणि आदराने साजरा करूया आणि चांगल्या आणि उज्वल भविष्यासाठी आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या मूल्यांचे पालन करण्याचा प्रयत्न करूया. 

Related Post

1 thought on “प्रजासत्ताक दिन मराठी निबंध republic day essay, information in marathi”.

Pingback: Republic Day Essay, Information For Students

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

प्रजासत्ताक दिन मराठी निबंध | Republic Day Essay In Marathi

Republic Day Essay In Marathi

26 जानेवारी – प्रजासत्ताक दिनावर निबंध – Republic Day Essay In Marathi – मराठीमध्ये गंततंत्र दिवस निबंध

मित्रांनो, प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. याच विषयावर आम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त SPPU Info मराठी आपल्या सर्वांसाठी मराठी निबंध सादर करत आहोत. येथे 100 शब्द, 300 शब्द आणि 500 ​​हून अधिक शब्दांमध्ये वेगवेगळे निबंध दिले आहेत जे विविध श्रेणीतील मुलांना वापरता येतील.

Republic Day Essay In Marathi

खाली आम्ही प्रजासत्ताक दिनाविषयी मनोरंजक माहिती देखील दिली आहे जी तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या भाषणासाठी वापरू शकता.

1. अतिशय लहान निबंध मराठी (वर्ग 1,2,3)

दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस देशभरात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी 1950 साली देशभरात संविधान लागू झाले! प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सण आहे जो संपूर्ण भारत वर्षभर एकत्र साजरा करतो. या दिवशी राजपथ (नवी दिल्ली) येथे विशेष परेड आयोजित केली जाते. जी राष्ट्रपती भवन, राजपथ मार्गे इंडिया गेटकडे जाते. प्रजासत्ताक (गण + तंत्र) म्हणजे लोकव्यवस्था! जी लोकशाहीचीही सामान्य व्याख्या आहे!

2. दीर्घ निबंध मराठीमध्ये (वर्ग 4,5,6,7)

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला म्हणतात जो दरवर्षी संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले आणि स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ लढ्यानंतर भारतीयांना त्यांचे कायदेशीर पुस्तक ‘ संविधान ‘ मिळाले. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि अडीच वर्षांनंतर ते लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित झाले.

स्वातंत्र्यानंतर, 28 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या बैठकीत एका मसुदा समितीला भारताच्या कायमस्वरूपी राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास सांगण्यात आले. 4 नोव्हेंबर 1947 रोजी भारतीय राज्यघटनेचा मसुदा डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात ठेवण्यात आला.

ते पूर्णपणे तयार होण्यासाठी सुमारे तीन वर्षे लागली आणि अखेर 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी होऊन प्रतीक्षा संपली. यासोबतच पूर्ण स्वराज्याच्या प्रतिज्ञाचाही आदर करण्यात आला.

भारतात, प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो जेव्हा लोक हा महान दिवस त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने साजरा करतात, जसे की बातम्या पाहून, शाळेत भाषणाद्वारे किंवा भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊन.

या दिवशी, भारत सरकारकडून नवी दिल्लीतील राजपथ येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो, जेथे ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतानंतर, भारताच्या राष्ट्रपतींसमोर इंडिया गेटवर भारतीय सैन्याकडून परेड होते.

3. प्रजासत्ताक दिन निबंध मराठी (तपशीलवार लेख)

परिचय – इतर राष्ट्रीय सणांप्रमाणे प्रजासत्ताक दिनही खूप महत्त्वाचा आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात नवीन राज्यघटना लागू झाली. बाबा साहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या मेहनतीने आणि बुद्धीने हे संविधान तयार झाले. या संविधानाची अंमलबजावणी करून आपण आपल्या राष्ट्राला पूर्ण अधिकाराने धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित केले. त्यामुळे २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणूनही ओळखला जातो.

२६ जानेवारीचे ऐतिहासिक महत्त्व – २६ जानेवारी १९३० रोजी रावी नदीच्या काठावर काँग्रेसचे अधिवेशन झाले. पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. काँग्रेसने नेहरूजींच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हे आपले ध्येय असल्याचे घोषित केले होते. तेव्हापासून भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष सुरू होता. अखेर १५ ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारीचे महत्त्व लक्षात घेऊन या दिवशीच भारताची नवीन राज्यघटना लागू करण्यात आली.

२६ जानेवारी – २६ जानेवारी हा राष्ट्रीय सण आहे. दिल्लीत विशेष उत्साहात आणि थाटामाटात याचे आयोजन केले जाते. या दिवशी परेडचेही आयोजन केले जाते. ही परेड विजय चौकापासून सुरू होऊन लाल किल्ल्यापर्यंत जाते. ही परेड पाहण्यासाठी पहाटेपासूनच लोकांची गर्दी होऊ लागते. सकाळी आठच्या सुमारास राष्ट्रपतींचा ताफा विजय चौकात पोहोचतो. पंतप्रधान त्यांचे स्वागत करतात. यानंतर तिन्ही लष्कराच्या जवानांनी राष्ट्रपतींना सलामी देतात. सैनिकांनंतर शाळकरी मुलांचे गट त्यांचे कार्यक्रम सादर करतात. मुलांचे विविध प्रकार पाहून मन प्रसन्न होते. यानंतर, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची आकर्षक झलक दिसून येते. या तक्त्यांमधून राष्ट्राच्या विकासाची झलक मिळते. विविध प्रांतांची सांस्कृतिक झलक आणि कर्तृत्वही समोर येते.

शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन- शाळांमध्येही प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. सकाळी आठच्या सुमारास शाळांमध्ये विद्यार्थी जमू लागतात. राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगणारी गाणी व इतर कार्यक्रमही सादर केले जातात. यावेळी मिठाईचे वाटपही केले जाते.

प्रांतांमध्ये प्रजासत्ताक दिन – विविध राज्यांच्या राजधान्यांमध्येही प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कवी संमेलने आयोजित केली जातात. देशातील सर्व सरकारी इमारतींवर रोषणाई करण्यात येते. राष्ट्रपती भवनात रोषणाईचा विशेष कार्यक्रम होतात.

निष्कर्ष – आपण त्याग आणि संघर्षाने भारत स्वतंत्र केला होता. त्यासाठी हजारो तरुण, मुले, माता-भगिनींनी बलिदान दिले होते. त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण भारताचे स्वातंत्र्य आणि राज्यघटनेची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करू, अशी प्रतिज्ञा घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. देशाच्या समृद्धी, एकता आणि अखंडतेसाठी आम्ही मनापासून, बुद्धीने आणि संपत्तीने काम करू.

इतर महत्वाचे मुद्दे

मित्रांनो, खाली दिलेले मुद्दे वाचून तुम्ही प्रजासत्ताक दिनी एक चांगले भाषणही तयार करू शकता. याशिवाय प्रजासत्ताक दिनाबाबतची तुमची माहितीही तुम्हाला चांगला लेख लिहिण्यास मदत करेल.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीलाच का साजरा केला जातो?

डिसेंबर १९२९ मध्ये लाहोरमध्ये जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले, त्यात एक ठराव मंजूर करण्यात आला आणि असे जाहीर करण्यात आले की, जर ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला अधिराज्य घोषित केले नाही, तर भारत स्वतः घोषित करेल. पूर्णपणे स्वतंत्र. करेल.

26 जानेवारी 1930 पर्यंत ब्रिटीश सरकारने काहीही केले नाही, तेव्हा त्या दिवशी काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याचा निर्धार जाहीर केला आणि संपूर्ण स्वातंत्र्यासाठी सक्रिय चळवळ सुरू केली.

२६ जानेवारीचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी भारत दरवर्षी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करेल असा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

त्याचबरोबर २६ जानेवारीचे महत्त्वही वाढते कारण या दिवशी २६ जानेवारी १९५० रोजी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असलेल्या देशाचे संविधान तयार झाले. जेव्हा ते अस्तित्वात आले तेव्हा भारत खऱ्या अर्थाने एक सार्वभौम देश झाला. हा दिवस त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त करतो! या दिवशी आपण सर्वजण त्यांच्या बलिदानाचे स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली वाहतो!

आम्हाला आशा आहे की प्रजासत्ताक दिन निबंध मराठी, मराठी निबंध प्रजासत्ताक दिनावर, प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी निबंध, Essay On 26 January, Republic Day Essay In Marathi, Marathi essay On Republic Day हे निबंध लेखन नक्की आवडले असेल, धन्यवाद

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

x

IMAGES

  1. Happy Republic Day In Marathi

    essay on republic day in marathi

  2. 20+ Republic Day Wishes In Marathi

    essay on republic day in marathi

  3. Happy Republic Day Wishes 2020 Message Greetings SMS in Marathi

    essay on republic day in marathi

  4. Republic Day Poem In Marathi

    essay on republic day in marathi

  5. Republic Day Message In Marathi

    essay on republic day in marathi

  6. Republic Day 2020 Messages: प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी

    essay on republic day in marathi

COMMENTS

  1. प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

    Essay On Republic Day In Marathi प्रजासत्ताक दिनाच्या विषयावर दिलेला हा निबंध ...

  2. प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

    26 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा भारतीय प्रजासत्ताक दिन या ...

  3. गणराज्य दिन वर मराठी निबंध || Essay On Republic Day » In Marathi

    गणराज्य दिन यावर 300 शब्दांत मराठी निबंध || Essay On Republic Day In 300 Wirds In Marathi : गणराज्य दिन हा 26 जानेवारी रोजी साजरा होणारा राष्ट्रीय सं आहे. या दिवशी ...

  4. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठी

    प्रजासत्ताक दिन निबंध मराठी 130 शब्द - Republic Day Essay in Marathi 130 Words. आपल्या ...

  5. Republic Day Essay In Marathi: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन निबंध मराठीमध्ये

    आपल्याला Republic Day Essay In Marathi या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्याला इतर ...

  6. भारतीय प्रजासत्ताक दिन

    राजपथावरील संचलन - राष्ट्रपतीना मानवंदना. भारतीय प्रजासत्ताक ...

  7. 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन (26 January Republic Day)

    प्रजासत्ताक दिवस मराठी निबंध - 26 जानेवारी निबंध मराठी - 26 January Republic Day ...

  8. प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Best Essay On Republic Day In Marathi

    Best Essay On Republic Day In Marathi : प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन (26 जानेवारी ...

  9. मराठीत निबंध : प्रजासत्ताक दिन

    पण त्याची लोकशाही - essay in Marathi about Republic Day. गुरूवार, 14 मार्च 2024. Choose your language;

  10. Republic Day Essay In Marathi

    नमस्कार मित्रांनो आणि नवीन पोस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या पोस्टमध्ये "Republic Day Essay In Marathi" याविषयी माहिती देणार आहोत.

  11. Republic Day: २६ जानेवारीला का साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन? जाणून

    Republic Day 2024: भारत आपला प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी साजरा करतो ...

  12. Republic day 26 January essay in Marathi

    Republic day 26 January essay in Marathi | गणतंत्र दिवस मराठी निबंध. मंगळवार, जानेवारी ०७, २०२०. २६ जानेवारीला संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण असते कारण ...

  13. Republic Day Essay Marathi

    Marathi Essay पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा ...

  14. (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

    (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | Republic Day Speech in Marathi सर्वांना ...

  15. Republic day 2024 Speech: Essay Nibhandh Bhashan in Marathi for School

    Republic day 2024 Speech: प्रजासत्ताक दिनी राजपथावर राष्ट्रपतींच्या हस्ते ...

  16. Republic Day Speech in Marathi 2023: Republic Day Bhashan Essay Nibandh

    Republic Day Speech in Marathi 2023: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 ...

  17. Republic Day 2024 Speech: प्रजासत्ताक दिनी भाषण करताय? या टिप्स फॉलो

    Republic Day 2024 speech, Essay in Marathi: प्रजासत्ताक दिन काहीच दिवसांवर आला आहे. या ...

  18. Republic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करायचंय

    Republic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा ...

  19. प्रजासत्ताक दिन निबंध मराठी

    Republic day essay in marathi : आपल्या देशात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन ...

  20. प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध, Essay On Republic Day in Marathi

    Essay On Republic Day in Marathi - प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध. प्रजासत्ताक दिन ...

  21. प्रजासत्ताक दिन मराठी निबंध Republic Day Essay, Information In Marathi

    Home; Marathi Essay; प्रजासत्ताक दिन मराठी निबंध Republic Day Essay, Information In Marathi

  22. प्रजासत्ताक दिन मराठी निबंध

    26 जानेवारी - प्रजासत्ताक दिनावर निबंध - Republic Day Essay In Marathi ...